
काढणीनंतर तुर, मूग, उडीद व इतर कडधान्यामध्ये काडी, कचरा, माती, अपरिपक्व दाणे तसेच लहान खडे वगैरे असतात. धान्यातील ही घाण स्वच्छ करून एकसारख्या आकारमानाचे दाणे वेगळे काढणे आवश्यक असते. कारण बारीक आणि अपरिपक्व दाण्यापासून मिळणारी डाळ हलक्या प्रतीची असते. अशी डाळ चांगल्या डाळीत मिसळल्याने सर्वच डाळीची प्रत बिघडते म्हणून डाळ बनविण्यासाठी तुर सारख्या आकारमानाची असणे गरजेचे आहे. यालाच प्रतवारी करणे असे म्हणतात. धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान योजने अंतर्गत तयार केलेल्या सफाई व प्रतवारी यंत्राचा वापर करावा.
पंकृवी सफाई व प्रतवारी यंत्र कसे कार्य करते ?
या यंत्राच्या चाडी मधून कडधान्य गोल चाळणीवर जाण्याचा अगोदर पंख्याद्वारे कडधान्यातील काडीकचरा स्वच्छ होतो.
चाळण्यावर कडधान्य गेल्यानंतर कडधान्य तीन प्रतीमध्ये वेगवेगळे होते. या यंत्रामध्ये पंख आणि गोल चाळणी असे दोन महत्त्वाचे भाग असतात.
यातील गोल चाळणी ही चार भागात विभागलेली आहे.
या यंत्रामध्ये तूर, मूग, उडीद तसेच इतर कडधान्य आणि धान्यांची प्रतवारी करता येते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.