Farm Planning: खरिपात देशी कापूस व मका, त्यानंतर खरबूज, कलिंगड, गवार व गिलके याप्रकारे नागणखुर्द (जि. जळगाव) येथील नितीन पाटील यांनी व्यावसायिक पीक पद्धतीने तंत्र आत्मसात केले आहे. पाण्याची उपलब्धता व बाजारपेठेची मागणी, त्यानुसार पिकांची निवड, एकरी उत्पादकता व गुणवत्तेचा विचार, नवे तंत्रज्ञान, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, फेरपालट अशा विविध अंगांनी त्यांनी आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व कमी जोखमीची केली आहे. .जळगाव जिल्ह्यात नागणखुर्द (ता. जामनेर) शिवारात नितीन पाटील यांची आठ एकर शेती आहे. माती काळी कसदार आहे. नदी किंवा पाण्याचा मजबूत स्रोत परिसरात नाही. पावसाळा आणि दोन विहिरी यावरच त्यांच्या शेतीची मुख्य भिस्त असते. नितीन यांनी वडील प्रयाग यांच्याकडून शेतीचा वारसा आणि त्याचे धडे घेतले. बंधू सचिन पुण्यात नोकरीस असल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी नितीन यांच्यावरच आहे. कुटुंबीयांची साथ, ट्रॅक्टर, व्यवस्थापनासाठी कामगार अशी यंत्रणा आहे..नितीन यांनी कृषी विषयात पदविका घेतलेल्या नितीन यांनी सुरवातीच्या काळात बियाणे कंपनीत नोकरी धरली. त्या वेळी उत्पन्नवाढीची तेवढी गरजच होती. जानेवारीतच विहिरी आटायच्या. शेती फायदेशीर ठरत नव्हती. कंपनीत ११ वर्षे ‘मार्केटिंग’ क्षेत्राचा अनुभव घेतल्याने शेतकऱ्यांचे संपर्क वाढले. विविध प्रयोगांमागील तंत्र माहीत झाले. शेती पद्धतींचे आकलन झाले. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर नितीन यांनी जामनेर येथे म्हणजे राहण्याच्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र सुरू केले..Agriculture Success Story: नोकरीपेक्षाही शेती देतेय भरपूर उत्पन्न.सुधारित शेती व पीक पद्धती तंत्रनोकरीत आलेल्या विविध अनुभवांमधून नितीन यांनी आपल्या स्थानिक हवामानाला सुसंगत अशी पीकपद्धती तयार करण्यास सुरुवात केली. बाजारपेठांचा अभ्यासही त्यामध्ये महत्त्वाचा ठरला. आपले जामनेर येथील कृषी सेवा केंद्र सांभाळून ते नऊ किलोमीटरवरील आपल्या शेतात व्यावसायिक पीक पद्धतीचे तंत्र हुशारीने वापरताना दिसत आहेत. खरिपात बहुतेक कापूस उत्पादक संकरित वाणांना पसंती देतात. नितीन यांनी मात्र जाणीवपूर्वक देशी वाणाला पसंती दिली आहे..ते सांगतात, की संकरित वाणांपेक्षा त्याची उत्पादकता जास्त आहे. दरवर्षी दोन ते तान एकर क्षेत्र असते. एकरी १२ ते १३ क्विंटल उत्पादन मिळते. देशी वाणाला व्यापारी जास्तीचा दर देतात. संकरित वाणांना क्विंटलला ७००० रुपये दर असल्यास देशी वाणाला ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल दर जास्त मिळतो. कपाशीला जोड म्हणून अडीच- तीन एकरांत मका असतो. त्याचे खरिपात एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो..कमी कालावधीची पीक पद्धतीकापूस व मका या पिकांच्या काढणीनंतर नोव्हेंबरच्या दरम्यान मोकळ्या झालेल्या क्षेत्रात नितीन यांनी कमी कालावधीच्या पिकांचा प्रयोग केला आहे. यात कलिंगड, खरबूज, गिलके, गवार यांचा समावेश आहे. या भागात जलस्रोत कमी असल्याने तीव्र उष्णता सुरू होण्यापूर्वीच पिके कशी हाती येतील यादृष्टीने पिकांची निवड केली आहे. पाऊस बरा राहिल्यास विहिरीत मार्च- एप्रिलपर्यंतच बऱ्यापैकी जलसाठा असतो. मात्र पाऊसमान कमी राहिल्यास जानेवारी, फेब्रुवारीतच जलसंकट असते..त्यादृष्टीने लागवड वेळेवर आटोपली जाते. कलिंगडाचे एकरी २० टनांच्या दरम्यान तर खरबुजाचे १२ ते १३ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. खरबुजाला दरवर्षी किलोला १७ रुपयांपर्यंत दर मिळतो. सिलिगुडीच्या व्यापाऱ्याने यंदा नुकताच १९ ते २० रुपये दर देऊन खरेदी केली आहे. दोन वर्षांपूर्वी निर्यातदारांच्या माध्यमातून किलोला साडेसतरा रुपये दर मिळून ३२ टन खरबुजाची निर्यात सौदी अरेबिया देशात केल्याचे नितीन यांनी सांगितले..Agriculture Technology: शेतीमध्ये ‘इलेक्ट्रो कल्चर’ तंत्रज्ञानाचा वापर.कलिंगडातील मिरची लागवडीचे तंत्रतीन एकरांतील कलिंगडात मिरचीची सुमारे नऊ हजार झाडे लावली जातात. काही वेळेस जून, जुलैतही मिरचीचे स्वतंत्र पीक घेण्यात येते. नंदूरबार व गुजरात राज्यातील सुरत या मिरचीच्या दोन महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. दोन्हींची गरज लक्षात घेऊन आखूड, लांब, तिखट आदी प्रकारच्या विविध वाणांची लागवड केली जाते..सुरत येथे भज्यांसाठी आखूड व कमी तिखट-जाड मिरचीची मागणी असते. कलिंगडाच्या लागवडीनंतर २० दिवसांनी मिरची लावण्यात येते. कलिंगडाचे हार्वेस्टिंग सुरू होते, त्या वेळीमिरचीचे तोडे सुरू होतात. व पुढे मिरचीचा प्लॉट सुरू राहतो. मिरचीला किलोला ३०, ४० ते कमाल ५० रुपयांपर्यंत दर मिळतो. काहीवेळा मुख्य कलिंगडापेक्षा मिरची आंतरपीकच जास्त फायदा देऊन जाते असे नितीन सांगतात..पीक व्यवस्थापन तंत्र- ठळक बाबीनितीन सांगतात, की सन २०११-१२ च्या दरम्यान आमच्या भागात खरबूज, हे पीक नवे होते. पॉली मल्चिंगदेखील नवे तंत्र होते. त्या काळात त्यांचा प्रयोग सुरू केला. आज आमच्या भागात खरबूज व पॉली मल्चिंग चांगल्या प्रकारे रुजले आहे.कृषी पदविका व नोकरीतील अनुभव यातून मिळालेल्या ज्ञानाधारे पीक संरक्षण प्रभावी केले जाते..कलिंगड, खरबुजाची पाच बाय सव्वा फूट अंतरावर गादीवाफ्यावर लागवड. खरबुजात क्रॉप कव्हरचा वापर.दीड एकरांतील गवारी तीन टन उत्पादन व किलोला ६० ते ७० रुपये, तर २० गुंठ्यांतील गिलके क्रेटला ४०० रुपयांपर्यंतचा दर मिळवून देते.पीक फेरपालट व जमीन सुपीकतेवर भर दिला आहे. दरवर्षी कुजलेल्या शेणखताचा उपयोग एकरी दीड टन- याप्रमाणे होतो. प्रत्येकी दोन गाई व म्हशी आहेत. ताक, गूळ, जिवाणू, शेण-गोमूत्र यांची स्लरीनिर्मिती पाच हजार लिटरच्या टॅंकमध्ये केली जाते. दर १५ दिवसांनी एकरी पाच लिटर याप्रमाणे फिल्टर व ठिबकद्वारे त्याचा पिकांसाठी वापर होतो..खोल नांगरणी करून जमीन तापू देण्यावरही असतो भर. त्यामुळे जमिनीद्वारे उद्भवणाऱ्या बुरशीजन्य समस्या कमी होण्यास मदत होते.तोट्यातील शेती कशी नफ्यात आणता येईल याचे अभ्यासकेंद्र म्हणून नितीन पाटील यांचे शिवार परिसरात प्रसिद्ध आहेबांधावर मुळा, मेथी, कोथिंबीर, शेपू आदींची होते लागवड. घरासाठी लागणारा बहुतांश भाजीपाला घरच्या शेतातच पिकविण्यात येतो.नितीन पाटील ९८५०८९१६६३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.