Crop Insurance News : ...अखेर सरकारने आदेश काढला, आता फक्त १ रुपयात मिळणार पीक विमा

Pradhan Mantri Pik Vima Yojana : राज्य सरकारने अर्थसंकल्पात १ रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. त्यानंतर नुकताच सरकारने शासन निर्णय काढला असून आता शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पीक विमा नोंदणी करता येणार आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

PMFBY : शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती. मात्र, त्याचा शासन निर्णय काढला नव्हता. त्यावर विरोधी पक्षांनी सरकारवर टिका केल्यानंतर राज्य शासनाने शासन निर्णय काढला. त्यामुळ आता शेतकऱ्यांना केवळ १ रुपयामध्ये पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे.

Crop Insurance
Crop Loan : पीक कर्जाची माहिती ‘एका क्लिक’वर

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा भरण्याची घोषणा केली होती. परंतु कृषी विभागाकडून आदेश न काढल्याने घोषणेची अंमलबजावणी होत नव्हती.

विधानपरिषदेचे विरोध पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एका ट्विटद्वारे सरकारवर हल्ला चढवला. खरीप हंगामाच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. हंगामातील अनेक पिकांच्या विम्याची रक्कम भरण्याची मुदत संपली आहे. तर काही पिकांची मुदत संपत आली असतानाही अजून शासन निर्णय काढला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे सरकारने तातडीने शासन निर्णय काढावा,  अशी मागणी केली होती.

Crop Insurance
Crop Insurance News : तुपकरांच्या आंदोलनाचा धसका, पीक विमा कंपनीकडून ७० कोटी रूपये भरपाई मंजूर

त्यानंतर आता कृषी विभागाने सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना फक्त १ रुपयामध्ये ५ प्रकारच्या नुकसानाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत विम्याच्या हप्त्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच नगदी पिकांसाठी ५ टक्के हिस्सा द्यावा लागतो. पण आता सर्वसमावेशक पीक विमा योजनेत शेतकरी हिश्श्याचा भार राज्य सरकार उचलणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरून विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

या पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य कृषी आयुक्तांची असेल. या योजनेत संबंधित शेतकऱ्याला आपले सरकार केंद्र, बॅंक किंवा पीक विमा पोर्टलच्या माध्यमातून सहभागी होता येईल. ही योजना खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत राबविली जाणार आहे.  

या पीक योजनेचा लाभ कधी मिळेल?

१. प्रतिकूल हवामानामुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
२.  हंगाम सुरु असताना प्रतिकूल हवामानामुळे झालेले पिकांचे नुकसान

३. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी उत्पान्नात घट (पावसातील खंड, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, पूर, भूस्खलन)
४. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
५. नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com