
Yavatmal News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत १०४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी ६५ प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. मंजूर प्रस्तावांपैकी ४४ अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या खात्यावर प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे लाभ देण्यात आलेला आहे.
‘शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा’ हा उपक्रम १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघातग्रस्त होऊन मृत्यू झालेल्या चार शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपये रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते देऊन विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा या उपक्रमाच्या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहोचविणे, प्रस्थापित लाभार्थ्यांची यादी तयार करणे व त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहे.
त्याकरिता जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाअंतर्गत ठरविण्यात आलेले आहे.
कृषी विभागामार्फत विविध योजना अंतर्गत १३ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मंजूर प्रस्तावांपैकी ४४ अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या खात्यावर प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे लाभ देण्यात आलेला आहे.
जत्रा शासकीय योजनांची अभियानांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.