Global Warming: तापमानात दरवर्षी सातत्याने वाढ होत असताना मानवासाठीच्या बचावात्मक उपायांपलीकडे जाऊन एकंदरीतच सजीव सृष्टी वाचविण्यासाठी आता प्रयत्न व्हायला हवेत..सन २०१५ पर्यंत पृथ्वीचे तापमान काही वर्षी वाढले तर काही वर्षी ते कमी झाल्याच्या नोंदी आहेत. परंतु २०१५ पासून मागील दशकभरात पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. ४४ अंश सेल्सिअसची नुकतीच नोंद झालेले अकोला शहर हे जगभरातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या पहिल्या १५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील पाच तर देशातील एकूण १० शहरांचा समावेश असेल तर हे निश्चितच चिंताजनक म्हणावे लागेल. .Summer Temperature Rise: तापमानात वाढ शक्य; उन्हाळी हंगामास सुरुवात.सूर्य आग ओकत असताना कोकणात उष्ण -दमट हवामानाचा, तर उर्वरित राज्यात उष्ण लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यातील २७ जिल्हे, ७६ टक्के लोकांना या उष्णतेच्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेत बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचना विविध माध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत. .वाढत्या तापमानाचा प्रतिकूल परिणाम मानवासह संपूर्ण सृष्टीवरच होत आहे. अशा वेळी तापमानात दरवर्षी सातत्याने वाढ होत असताना मानवासाठीच्या बचावात्मक उपायांपलीकडे जाऊन एकंदरीतच सजीव सृष्टी वाचविण्यासाठी आता प्रयत्न व्हायला हवेत. औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांची वाढलेली संख्या, वीज निर्मितीसाठी जाळला जात असलेला कोळसा आणि वाहतुकीसाठी पेट्रोल-डिझेलचा वाढता वापर हे जागतिक तापमानवाढीची मुख्य कारणे आहेत. याबरोबर अनियंत्रित वृक्षतोडीचा देखील हा परिणाम म्हणता येईल..Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढली.सातत्याने तापमानवाढ ही गंभीर समस्या ठरत आहे. तापमान वाढीमुळे पृथ्वी, समुद्र, व बर्फाच्छादित प्रदेश यावर परिणाम होत असून त्याचा परिणाम वादळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, अनिश्चित पाऊसमान, वादळी वारे, उष्णलहर, गारपीट, शीतलहर, पावसाचे खंड, मातीची धूप व दुष्काळाने वाळवंट पसरत जात आहे. हवेच्या तापमानापेक्षा जमिनीचे तापमान नेहमीच अधिक राहत असल्याने जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी होऊन सुपीकता कमी होत आहे. पाणीसाठे आक्रसले जात असून त्यांचे दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे..पिकांवर कीड-रोगांची तीव्रता वाढत आहे. पिकांच्या चयापचय क्रियेत बदल होत आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावत आहे. हे असेच चालू राहिले तर पुढील दोन- अडीच दशकांत जागतिक अन्न उत्पादन १९ टक्क्यांनी घटेल, असे अनेक संशोधन अहवालातून पुढे आले आहे. अशा प्रकारच्या अन्न उत्पादनातील घटीने भूक, आर्थिक व सामाजिक स्थैर्याची चिंता जगभर वाढत जाणार आहे. तापमानवाढीचे गंभीर धोके लक्षात घेऊन याबाबत सर्वांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याबाबतचे सल्ले अनेक जाणकारांनी दिले आहेत. परंतु दुर्दैवी बाब म्हणजे कोणताही देश याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही..तापमानवाढीचे सर्वाधिक चटके भारताला बसत आहेत. अशा वेळी जग काय करते हे पाहण्यापेक्षा आपल्याला आग्रही पुढाकार घ्यावा लागेल. तापमानवाढ कमी करायची असेल तर आपल्याला कर्ब उत्सर्जन शून्यावर आणावे लागेल. त्याकरिता जीवाश्म इंधनाऐवजी जैव इंधनावर भर द्यावा लागेल. अक्षय ऊर्जास्रोतांचा वापरही वाढवावा लागेल. अनियंत्रित वृक्षतोड थांबवून शक्य तिथे झाडे लावावी लागतील. पर्यावरण समतोल राखण्यासाठी वनक्षेत्रात दुपटीने वाढ करावी लागेल. हवामान बदलास अनुकूल शेतीचा अवलंब करावा लागेल. कार्बन ट्रेडिंगचा देशातील लहानमोठ्या शेतकऱ्यांना कसा लाभ घेता येईल, हेही पाहावे लागेल. हवामान बदलाच्या परिणामाची दाहकता कमी करण्यासाठी मानवाला नैसर्गिक बदल समायोजित करण्याची गरज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.