पर्यावरण विरुद्ध विकास हा संघर्ष पुढे वाढत जाणार आहे. अशावेळी माधव गाडगीळ यांच्या कामाचा मूळ गाभा असणाऱ्या समतोल विकासाची कास आपल्याला धरावीच लागेल.माधव गाडगीळ यांच्या निधनाने समाजातील एक अभ्यासू आणि विवेकी स्वर लोपला आहे. जल, जंगल आणि जमिनी यांच्यावर विकासाच्या नावाखाली होत असलेल्या सुसाट अतिक्रमणांच्या विरोधात बोलणारा, त्यातले धोके दाखवून देणारा हा स्वर होता. त्यामागील त्यांची सारी तळमळ ‘पश्चिम घाटा’संबंधी त्यांनी तयार केलेल्या अहवालात प्रतिबिंबित झाली आहे. .पर्यावरण आणि विकास या दोन गोष्टींतील ताण ही एकविसाव्या शतकातील महत्त्वाच्या संघर्षाची भूमी असणार आहे, हे आता हवामान बदलाच्या, प्रदूषणाच्या, अनारोग्याच्या संकटामुळे स्पष्टच झाले आहे. एकीकडे हे संकट आणि दुसरीकडे १४० कोटी जनतेच्या आकांक्षांना पुरे पडता यावे, यासाठी चाललेली धडपड. रोजगारनिर्मितीच्या, उत्तम जीवनमानाच्या आकांक्षांचा हा रेटा खूप जोरदार असल्याने पर्यावरण समस्यांकडे होत असलेले दुर्लक्ष ही सर्वांत चिंतेची बाब आहे..Madhav Gadgil Passes Away: सह्याद्रीचा सखा हरपला.गाडगीळ यांच्यासारखी जणू एक ‘संस्था’च बनलेली व्यक्ती म्हणूनच फार महत्त्वाची होती. पर्यावरणाचा विचार माधव गाडगीळ शास्त्रीय पद्धतीनेच मांडत होते. त्यांच्या मांडणीकडे संख्याशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अशा दोन्ही दृष्टिकोनांतून भक्कम पुरावा असे. अलीकडे राज्यात बिबट्यांचे हल्ले वाढत असताना बिबट्यांना चक्क ठार मारण्याची परवानगी सरकारने द्यावी, असे वस्तुनिष्ठ मत त्यांनी व्यक्त केले होते..संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना वर्षभरापूर्वीच जाहीर झाला होता. हा जीवनगौरव पुरस्कार त्यांना पश्चिम घाटातील जैवविविधतेचे जतन आणि संशोधनाच्या अतुलनीय योगदानाबद्दल देण्यात आला. यापूर्वी त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण क्षेत्रातील पुरस्कारासह पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..Dr. Madhav Gadgil : ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ८३ व्या वर्षी निधन.परंतु जागतिक पातळीवरील पर्यावरण क्षेत्रासाठीच्या या सर्वोच्च सन्मानाने त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने नोंद जागतिक पटलावर झाली. सजीव सृष्टी व भोवतालचा निसर्ग अर्थात परिस्थितिकी (इकॉलॉजी) आणि त्या अनुषंगाने पर्यावरण या विषयाभोवती जीवनभर कार्य करीत राहणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु यातील त्यांचा अभ्यास, आवड आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम सजीव सृष्टीला भोगावे लागू नयेत यासाठीच्या तळमळीतून त्यांना हे शक्य झाले होते. अगदी तळागाळातील लोकांचा विचार ही त्यांच्या लोकशाहीची संकल्पना आहे..भारतातील सहा राज्यांत विस्तारलेला पश्चिम घाट हा परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. याची जागतिक वारसा स्थळ म्हणूनही नोंद झाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील या भागांवर अनेक प्रकारे अतिक्रमणे होत असताना याची नेमकी काय अवस्था आहे, हे जाणून घेण्यासाठी २०१० मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने नेमलेल्या समितीचे माधव गाडगीळ अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी पश्चिम घाटाचा संपूर्ण परिसर अक्षरशः पिंजून काढून वास्तवदर्शी अहवाल सरकारला सादर केला..त्यात त्यांनी पश्चिम घाटाचा बहुतांश भाग हा अतिसंवेदनशील असून तिथे कुठलेही विकास काम करू नये, शेती सेंद्रिय पद्धतीनेच करावी, धरणे बांधू नयेत, खाणकाम करू नये अशा सूचना केल्या होत्या. परंतु विनाशकारी विकास करणाऱ्या राज्यकर्त्यांना हा अहवाल काही पचनी पडला नाही. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या पाच टक्क्यांहूनही कमी क्षेत्र पश्चिम घाट परिसराचे आहे. एवढा परिसर सोडून इतरत्र वाट्टेल ते विकास राज्यकर्त्यांना करता येणार आहे..परंतु तसे न करता याच भागाचे लचके तोडले जात असल्याने जैवविविधता, पर्यावरण याबाबत आपण किती असंवेदनशील आहोत, हे स्पष्ट होते. यापुढे पर्यावरण विरुद्ध विकास हा संघर्ष वाढत जाणार आहे. अशावेळी माधव गाडगीळ यांच्या कामाचा मूळ गाभा असणाऱ्या समतोल विकासाची कास आपल्याला धरावीच लागेल. अन्यथा विनाश अटळ आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.