बदलत्या हवामान काळात कोकणातील आंबा, काजूच्या बागांबरोबर शेतीही टिकून ठेवायची असेल, तर तेथील शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकार दरबारी गांभीर्याने विचार व्हायला हवा.उद्या गुढीपाडवा! राज्यात सर्वत्र गुढ्या उभारून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना हापूस आंबा उपलब्ध करून देण्याचे नियोजन शेतकरी, अडतदार, व्यापारी असे सर्वांचेच असते. या वर्षी मात्र हवामान बदलामुळे हापूस आंबा उत्पादनात ७० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता वर्तविली जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने प्रत्यक्ष पाहणीतून कृषी खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिलेल्या अहवालात आंबा उत्पादनात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८५ ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक घट होणार असल्याचे नमूद केले आहे. .हापूस आंबा उत्पादनातील ही घट काही या वर्षीची नाही. हवामानाच्या बाबतीत आंबा फारच संवेदनशील पीक आहे. अगदी ठरावीक वातावरण असले, तरच हापूस पुरेसे उत्पादन देतो. हवामानात थोडा जरी बदल झाला तरी हे पीक दगा देते. असे असताना मागील दशकभरापासून हवामान बदलाचा फटका कोकणातील आंबा पिकाला बसत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून हापूसचे जेमतेम १५ ते २५ टक्केच उत्पादन मिळत आहे. आंब्याबरोबर कोकणातील नारळ, सुपारीच्या बागा, मसाला पिके तसेच येथील मासेमारी देखील बदलत्या हवामानात धोक्यात आली असून, शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे..Maize Farmers Issue: 'इथेनॉल'साठी तांदूळ दिल्यानं मका उत्पादक अडचणीत.सिंधुदुर्गच्या मुख्यालयावर हजारो आंबा आणि काजू बागायतदारांनी नुकताच काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ ही शेतकऱ्यांच्या उद्विग्नतेची सुरुवात आहे. हवामानFarmers Issue बदलामुळे बसणारा तडाखा आता कोकणातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला असल्याचे हे द्योतक आहे. सरकारसह शास्त्रज्ज्ञांनी देखील याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर या ठिणगीतून वणवा भडकण्यास वेळ लागणार नाही..कोकणातील कृषी क्षेत्राबाबत आतापर्यंतचे संशोधन वातावरणातील समतोल गृहीत धरून झाले आहे. त्यावरच विविध प्रकारच्या फळबागा येथे उभ्या राहिल्या. आता मात्र आंब्यासह इतरही बागा वातावरणातील हे बदल सहन करू शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बदलत्या हवामानास पूरक संशोधनावर भर द्यावी लागेल. त्या अनुषंगाने देवगड येथे अद्ययावत आंबा संशोधन केंद्र स्थापन करून एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हवामान, रोगनियंत्रण व आधुनिक शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत..Farmers Issue: चिकुर्डे येथे विद्युत केबलवर चोरट्यांचा डल्ला.आंबा उत्पादन घटीने मोठा आर्थिक फटका बसल्याने सरकारच्या पारंपरिक भरपाईच्या निकषांऐवजी (हेक्टरी १७ हजार) राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून हेक्टरी पाच लाख रुपये मदतीची मागणी शेतकरी करीत आहेत. दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली असताना आंबा, काजू उत्पादकांनी संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे..एकीकडे हवामान बदलाचा कहर सुरू असताना दुसरीकडे कोकणात बनावट निविष्ठांमुळे आंब्यासह सर्वच पिकांचे नुकसान वाढत आहे. याबाबत कृषी विभागाने सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची शेतकऱ्यांनी केलेली मागणी रास्तच म्हणावी लागेल. आंबा, काजूच्या दरात बाजारात मोठे चढ-उतार होत असतात. ग्राहक पातळीवर या दोन्ही फळांचे दर अधिक असले तरी उत्पादकांना मात्र फार कमी दर मिळतो..त्यामुळे उसाप्रमाणे आंबा, काजूला रास्त किफायतशीर दराचा आधार मिळावा जेणेकरून बाजारात दर संरक्षण मिळेल, असेही कोकणातील शेतकऱ्यांना वाटते. हवामान बदलाचा फटका अख्ख्या जगाला बसत आहे; मात्र या बदलाचे केंद्र समुद्र असतो. त्यामुळे याचे थेट परिणाम किनारपट्टीच्या भागावर दिसतात. संपूर्ण कोकणाला किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे बदलत्या हवामान काळात कोकणातील आंबा, काजूच्या बागांबरोबर एकंदरीतच शेती टिकून ठेवायची असेल तर त्यांच्या मागण्यांवर सरकार दरबारी गांभीर्याने विचार व्हायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.