शिवाजी काकडेChild Development: प्रत्येक मूल जन्मतःच सर्जनशील असतं. घरात, परिसरात खेळणार मूल जिज्ञासेतून, वेगवेगळ्या माध्यमातून शिकत असतं. मुले आपल्या कल्पकतेतून नवनवीन खेळ तयार करतात. ही मुलांची नवनिर्मिती असते..ओ शो यांनी काही बोधकथा लिहिल्या आहेत. त्यातील ही गोष्ट. एका उंच व दुर्गम पर्वतावर सुवर्ण मंदिर होते. तेथील पुजारी वृद्ध झाल्याने नवीन पुजारी निवडण्याची घोषणा करण्यात आली होती. एका विशिष्ट दिवशी ही स्पर्धा सुरू झाली. सर्वाधिक बलवान आणि सर्वप्रथम पर्वतावर पोहोचणारा व्यक्ती पुजारी म्हणून निवडला जाणार होता. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते. त्यांनी आपल्या ताकदीचे प्रतीक म्हणून आपापल्या क्षमतेप्रमाणे बल सिद्ध करण्यासाठी खांद्यावर दगड घेतले आणि चढाईस सुरुवात केली. .Child Marriage Prevention: अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क.पर्वत चढण्यास अत्यंत कठीण होता. अनेक हालअपेष्टा सहन करत तरुण चढाई करीत होते. एवढ्यात एक तरुण वेगाने पाठीमागून आला आणि सर्वांच्या पुढे गेला. सर्वजण त्याला मूर्ख समजून हसत होते. कारण त्याच्या खांद्यावर शक्तीचे प्रतीक म्हणून कोणतेही ओझे नव्हते. अनेक दिवसांचा कठीण प्रवास करून काही तरुण मंदीरावर पोहचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तो तरुण मंदिराचा पुजारी म्हणून निवडला गेलेला होता. या तरुणांनी काही तक्रार करण्यापूर्वीच वृद्ध पुजारी म्हणाला, ‘‘पर्वतारोहणापूर्वी खांद्यावर दगडांचे ओझे घेण्याचा सल्ला आपणास कुणी व का दिला होता?’’.शिक्षण आणि समाजव्यवस्थेने देखील मुलांच्या मनावर असे ओझे लादण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. मुलांना आयुष्यात यशस्वी करायचे असेल तर पहिलीपासून मुलांना बहुभाषिक करा, एआय शिकवा, सैनिकी शिक्षण द्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्या. बालपणात मुलांच्या भविष्याचा पाया दडला आहे म्हणून सारं काही पहिलीपासून किंवा प्राथमिक शिक्षणातच शिकवा, असा अट्टहास सगळीकडे सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० हे प्रत्येक व्यक्तीच्या सर्जनशील क्षमतेच्या विकासावर विशेष जोर देते. जिज्ञासू, नवीन कल्पना स्वीकारणारे, चिकित्सक व सर्जनशील विचार करणारे व स्वतःची मते व स्वतंत्र विचार असणाऱ्या व्यक्ती घडविणे हे शालेय शिक्षणाचे महत्त्वाचे लक्ष्य आहे. प्रत्येक मूल जन्मतःच सर्जनशील असतं. मात्र आपण महत्त्वाकांक्षेतून मुलांची सर्जनशीलताच नष्ट करतो..दप्तर, अपेक्षा अन् माहितीचे ओझेखेळण्या-बागडण्याच्या बालवयात मुलांच्या पाठीवर भलेमोठे दप्तराचे ओझे दिसते. सोबतच यशस्वी होण्यासाठीच्या अपेक्षांचेही. सगळीच यंत्रणा ज्ञानापेक्षा माहिती मुलांच्या डोक्यात टाकण्यासाठी सरसावली आहे. माहितीचा प्रचंड प्रस्फोट झालेला आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणतात, ‘‘माहिती जमा करणारा विद्यार्थी हा समाजाच्या कचराकुंडीसारखा बनला आहे. मुलांना भेटणारा प्रत्येक जण या ढिगाऱ्यात काहीतरी टाकतो व पुढे जातो. आईवडील, शिक्षक, मित्र, शत्रू, धर्मप्रचारक, समाजमाध्यमे, जाहिराती अशा बहुतेक व्यक्ती व वस्तू यात भरच टाकतात. कुणाकडून घ्यायचे व कुणाकडून नाही याचे स्वातंत्र्य मुलांना राहीले नाही. यामुळे जग अशांत आणि असर्जनशील होतयं.’’ अभ्यासक्रमाचा वाढलेला आशय, फक्त परीक्षाकेंद्री शिक्षणपद्धती आणि महत्वाकांक्षी जीवनपद्धती यामुळे मुलांच्या शरीर, मन, मेंदू आणि हृदयाला अनेक आजार जडताहेत. मग असे विद्यार्थी सर्जनशील होणार तरी कसे?.Education System: शिक्षणातून घडावा भावसमृद्ध समाज.समग्र प्रगतिपत्रकशिक्षणाचा अर्थ केवळ परीक्षेतील गुणांची उपलब्धी नाही; तर बालकांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि शारीरिक क्षेत्रांचा विकास समाविष्ट आहे. असे राष्ट्रीय शिक्षण धोरणाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केवळ गुणांच्या आधारे न करता विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील प्रगतीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ( NEP - 2020 ) ने समग्र प्रगतिपत्रकाची संकल्पना मांडली आहे. समग्र प्रगतिपत्रकात जाणीवजागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता हे तीन मूल्यांकनाचे रुब्रिक दिलेले आहेत. ते शिक्षक, पालक आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेने समजून घेणे आवश्यक आहे. आपली मुले सर्जनशील व्हावीत, मुलांची क्षमतावृद्धी व्हावी यासाठी बहुआयामी अध्यापनाचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल..सर्जनशील मनासाठीशिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा डोक्यात जे आहे ते बाहेर काढणे असते. मात्र, आपली शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या मस्तकात जे सुप्त दडलेलं आहे ते बाहेर काढण्याऐवजी बाहेर जे आहे ते डोक्यात भरण्याचे काम करत आहे. यामुळे मुलांसाठी शिकण्याची प्रक्रिया अवघड, कष्टप्रद आणि दुःखदायक होते. शिक्षण घेण्याचा हेतू ज्ञानार्थी बनण्याऐवजी केवळ परीक्षार्थी होऊन नोकरी मिळविणे एवढाच झाला आहे. आजची सारी शिक्षणव्यवस्था महत्वाकांक्षा आणि प्रतिस्पर्धा यावर उभी आहे. इच्छा असणे गैर नाही. .माणसाचे आयुष्यच इच्छेवर उभे राहते. पण विशिष्ट गोष्टच मिळावी ही अतिमहत्त्वाकांक्षी वृत्ती जीवनात असमाधान आणि अशांती निर्माण करते. विशिष्ट परीक्षांचा अट्टहास आणि महत्त्वाकांक्षेमुळे मुलांच्या मनामधे चिंता, भयाची निर्मिती होते. भीतीतून सर्जनशील मनाची निर्मिती होत नाही. यशस्वी होण्याच्या अट्टहासामुळे साध्या, सरळ, निर्मळ आणि प्रज्ञावान मनाची निर्मिती होत नाही. मुलांचे मन ताजेतवाने, निष्पाप आणि आनंदी असेल तर मुलांमध्ये सर्जनशक्ती निर्माण होते..प्रत्येक मूल जन्मतःच सर्जनशील असतं. घरात, परिसरात खेळणार मूल जिज्ञासेतून, वेगवेगळ्या माध्यमातून शिकत असतं. मुले आपल्या कल्पकतेतून नवनवीन खेळ तयार करतात. ही मुलांची नवनिर्मिती असते. शाळेत खेळणी आणि खेळ आधारित अध्यापन पद्धतीचा वापर केल्यास मुले खेळ, शोध आणि प्रत्यक्ष अनुभावाद्वारे शिकतात. वर्गात, शाळेत यामुळे आनंददायी वातावरण निर्माण होते. निरीक्षण खेळ, कृती, प्रयोग, अनुभव यातून शिकतात. शिकण्याची प्रक्रिया केवळ चार भिंतींच्या आत घडत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात मुले अधिक सर्जनशील होऊन शिकतात. मुलांना त्यांच्या मनातले विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्यासाठी शिक्षकांनी भूमिकापालन, गटचर्चा, वादविवाद, मुक्तसंवाद, मुलाखती अशा विविध पद्धतींचा वापर केला पाहीजे. .यासाठी शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असणे आवश्यक आहे. मातृभाषेतून सर्जनशील विचार आणि अभिव्यक्ती मुलांना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करता येते. चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक यांसारख्या कलाप्रकारांमुळे बालके त्यांचे विचार, भावना, कल्पना वैयक्तिक व वेगळ्या मार्गाने व्यक्त करू शकतात. कलेच्या समावेशामुळे बालकांच्या सर्जनशील विकासाच्या व वाढीच्या समग्र विकासास चालना मिळते. मुलांच्या आवडी, क्षमता लक्षात घेऊन त्यांना फुलण्याची संधी आणि स्वातंत्र्य दिल्यास मुलांमधील सर्जनशीलता बहरते. सतत शोध घेण्याच्या अध्ययन सवयींचा विकास करणे म्हणजे सर्जनशीलता होय. माहितीच्या ओझ्याखाली दबलेले मन नवोन्मेष करण्यास सक्षम नसते. सर्जनशीलतेतून विकसित भारताची नवनिर्मिती करण्यासाठी शिक्षक, पालक आणि व्यवस्थेने पुढाकार घ्यावा हीच अपेक्षा!७८८७५४५५५७(लेखक शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.