राहुल पडवळकेंद्र सरकारने नुकतीच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात अधिसूचना काढून नवीन नियमावली जाहीर केली आहे. नागरिकांसाठी या कचऱ्यांचे वर्गीकरण करून देणे बंधनकारक असणार आहे, तर त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे हे आस्थापनांसाठी बंधनकारक असणार आहे..सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट (SWM) रूल्स, २०२६ च्या नियमावलीनुसार शहरी व ग्रामीण विभागातील आस्थापना व नागरिकांसाठी घनकचरा वर्गीकरण व प्रक्रियेचे नियम अधिक स्पष्ट व कठोर केले आहेत. याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२६ पासून होणार आहे. या नियमानुसार घरगुती कचऱ्याचे चार प्रकारात वर्गीकरण केले आहे. ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा व विशेष काळजीचा कचरा. नागरिकांसाठी या कचऱ्यांचे वर्गीकरण करून देणे बंधनकारक असणार आहे, तसेच शासनाच्या नियमावलीप्रमाणे त्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे हे आस्थापनांसाठी बंधनकारक असणार आहे. विशेषतः ओल्या कचऱ्यापासून मोठ्या प्रमाणात जल, वायू व भू प्रदूषण होत असते..PVC Waste Management: शेतकऱ्यांकडील टाकाऊ पीव्हीसी पाइपपासून कचराडबा.वर्षानुवर्षे ओला कचरा अनिर्बंधपणे ‘कचरा डेपो’मध्ये टाकून नंतर त्याला आग लावली जाते व वर्षानुवर्षे तो कचरा जळत राहतो. तसेच त्यातून मिथेन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड इत्यादी घातक हरितवायूंचे उत्सर्जन होते. त्यापासून मानवाला श्वसनाचे रोग होतात, योग्य प्रक्रिया न केल्यास ओल्या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. परिसरातील नागरिकांना त्याचा असह्य उपद्रव होतो. साथीचे आजार देखील बळावतात. आता नवीन नियमावलीनुसार ओल्या कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट करणे किंवा किंवा बायोगॅस मधून बायोमेथिनेशन करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती होऊन हरित ऊर्जा निर्मिती होईल..कचऱ्याचे वर्गीकरण करा घरातचकेंद्र सरकारने काढलेली ही अधिसूचना, स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरणार आहे. दीडशे कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात घनकचरा हा अनेक दृष्टीने पर्यावरण व समाजासाठी घातक ठरत आहे. अनिर्बंध लँड फील म्हणजेच जमिनीत कचरा गाडल्याने मोठ्या प्रमाणात भू प्रदूषण होत आहे. तसेच ओल्या कचऱ्याकडे अनेक घातक कीटक, कृमी व अनेक अपायकारक जीव आकर्षित होऊन मानवी आरोग्यचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. योग्य प्रकारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास अशा प्रकारचे अनेक तोटे नागरिकांना व पर्यावरणाला भोगावे लागतात..Shrimp Shell Waste Management: कोळंबी कचऱ्यातून संपत्ती; कवचापासून मौल्यवान उप-उत्पादने निर्मिती! .परंतु घनकचऱ्याचे विशेषतः ओल्या कचऱ्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावयाचे असल्यास त्यात काही व्यावहारिक अडचणी आहेत. योग्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सुरुवातच घनकचरा वर्गीकरणापासून होते. कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांमधून करून घेणे हे अतिशय जिद्दीचे व चिकाटीचे काम आहे. अनेक वेळा नागरिक कचऱ्याच्या वर्गीकरणास योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत ते महानगरपालिकेच्या आरोग्य व कचरा व्यवस्थापनाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दृष्टीने नागरिकांकडून घनकचऱ्याचे वर्गीकरण करून घेणे व तो कचरा घंटागाडीपर्यंत आणून देण्याची सवय लावणे ही मोठी जिकिरीची बाब बनली आहे..आपल्या घरातील घरकचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे ही बाब नागरिकांनी समजून घेणे आवश्यक आहे. त्यावर पर्याय म्हणून नागरिकांनीसुद्धा आपल्या स्वतःच्या व समाजाच्या आरोग्याची तसेच पर्यावरणाच्या हानी टाळण्यासाठी, घरातूनच घनकचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून देणे अत्यंत अनिवार्य आहे. तसे न केल्यास इथून पुढे नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते, हे देखील महत्त्वाचे आहे..Waste Management: गुंतागुंत: कचऱ्याची आणि आपल्या जगण्याची!.कचऱ्यापासून कंपोस्टत्यानंतर पुढे संकलित केलेल्या ओल्या कचऱ्यावर शासनाच्या नियमावलीनुसार शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचे कंपोस्ट खतामध्ये रूपांतर करणे किंवा बायो मिथिनेशन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शासनाने या संदर्भात काम करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाने यापुढील वाटचालीची दिशा ठरवणे आवश्यक आहे. ओल्या कचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर केल्यामुळे अजून एक मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे मातीच्या घटत चाललेल्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी मोठी मदत होणार आहे..सध्या जगभरामध्ये वाढत्या रासायनिक कृषी निविष्ठांच्या वापरामुळे मातीच्या आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतीमध्ये मिसळल्या जाणाऱ्या रासायनिक अवशेषांमुळे मातीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सेंद्रिय कर्ब व सूक्ष्मजीव सृष्टीचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मातीचे उत्पादकता तर घटत आहे, परंतु रासायनिक शेतीतून पिकवलेल्या अन्नामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत. त्यामुळे अर्थातच मातीच्या आणि मानवाच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या सर्वांवर उपाय म्हणून शाश्वत - सेंद्रिय शेतीची संकल्पना जगभरातील अभ्यासक मांडत आहेत..Sugarcane Waste Management : ऊस पाचटापासून सेंद्रिय खताची निर्मिती ; शेतकऱ्यांसाठी फायदेशीर उपाय.सेंद्रिय खत हा शाश्वत सेंद्रिय शेतीचा पाया आहे. विविध सेंद्रिय पदार्थ शास्त्रशुद्धरीत्या कुजवून त्याचे कंपोस्ट करून त्याचा वापर जमिनीत खत म्हणून केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढते. जमिनीतील सूक्ष्मजीव सृष्टीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. जमिनीतील खनिजांचे प्रमाण टिकून राहते. एकंदर मातीचे आरोग्य सुधारले जाऊन उत्पादकता वाढते व उत्पादित झालेला शेतीमाल हा चांगल्या दर्जाचा असतो. त्याला ग्राहकांकडून सेंद्रिय कृषिमाल म्हणून चांगला बाजारभाव मिळतो..सध्या घटत चाललेल्या पशुधनामुळे चांगल्या व कुजलेल्या शेणखताचा पर्याय हा शेतकऱ्यांना महाग होत चालला आहे. रासायनिक खतांच्या किमती तर गगनाला भिडल्या आहेत. त्यावर पर्याय म्हणून सहज उपलब्ध असणारा मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ असणारा कच्चामाल म्हणून ओल्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करून शास्त्रशुद्धरीत्या त्याचे कंपोस्ट करून व प्रयोग शाळेमध्ये त्याचे जड धातू व पॅथोजन्स याची तपासणी करून शेतात वापरता येऊ शकते..त्यामुळे शासनाने आखून दिलेल्या या नियमांचा सर्व नागरिक तसेच विविध ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका राज्य सरकार आदी आस्थापनांकडून योग्य पालन झाल्यास शासनाच्या व नागरिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात कंपोस्ट खताची निर्मिती करता येऊ शकते. तसेच या कंपोस्ट खतामुळे होणारे मानवी आरोग्याचे व पर्यावरणाचे नुकसान तर टळेलच परंतु जमिनीचे आरोग्य चांगले होऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल. ग्राहकांना सुद्धा रसायनमुक्त अन्न खायला मिळेल, असा तिहेरी फायदा शासनाच्या या अधिसूचनेचा होताना पाहावयास मिळणार आहे.९९२१८८१००० (लेखक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सल्लागार आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.