रासायनिक अवशेषमुक्त अन्न विषयावर संशोधन व्हावे : थोरात

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

नगर  : सेंद्रिय पीक उत्पादन तर झालेच पाहिजे; पण लोकांना रासायनिक अवशेषमुक्त अन्न कसे मिळेल यावर राज्यातील सर्व विद्यापीठांनी संशोधन करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यक्रमासाठी आल्यावर संवाद साधताना मंत्री थोरात म्हणाले, की कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठे शेती विकासासाठी महत्त्वाचा भाग आहे. आज कोणतेच अन्न रासायनिक अवशेषमुक्त नाही अशीच भावना प्रत्येकाची झाली आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांचे योगदान मोठे आहे. कोणत्याही पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला की लोक विचारतात विद्यापीठ काय करत आहे? मात्र अनेक संशोधने विद्यापीठाने केली आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होत आहे.

रासायनिक अवशेषणुक्त अन्न मिळावे अशी प्रत्येकाची भावना आहे. मात्र अजून तरी लोकांना ते मिळतेय असे वाटत नाही. त्यावर आता विद्यापीठाने संशोधन करण्याची गरज आहे.  मी कृषिमंत्री असताना प्रत्येक विभागात विभागीय आढावा बैठक घ्यायचो. त्या बैठका अलीकडे बंद केल्या आहेत. मात्र या बैठका कृषी विभागाने सुरू कराव्यात, असेही मंत्री थोरात म्हणाले.   ‘आयुष्यात वाटायचे कृषिमंत्री व्हावे’ बाळासाहेब थोरात म्हणाले, की राज्यात अनेक वर्ष मी कृषिमंत्री म्हणून काम केले आणि तोच आयुष्यातील काळ चांगला गेला. केंद्रात शरद पवार कृषिमंत्री होते. त्यांच्यामुळे राज्याला खूप मोठी मदत मिळाली. मला लहानपणापासून वाटायचे कृषिमंत्री व्हावे. तसं तर हे खाते महत्त्वाचा विभाग असला तरी तो घ्यायला सहज कोणी तयार होत नाही. मागील पाच वर्षांत कोण कृषिमंत्री होते हेच कळले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com