पुणे : राज्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असल्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. राज्यात २०१९ च्या हंगामात उशिरा पाऊस झाला. तसेच, सोयाबीन पिकाच्या काढणीच्या कालावधीत अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे बियाण्याची गुणवत्ता आणि उत्पादनावरदेखील प्रतिकूल परिणाम झाला असावा, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
“बियाण्यांमधील ही अडचण विचारात घेता खरीप २०२० च्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी मागील दोन हंगामात प्रमाणित व पेरणी करून ठेवलेल्या बियाण्यांचा वापर करावा. त्यासाठी असे बियाणे आतापासूनच राखून ठेवावेत,” असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यात सोयाबीनखालील सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार हेक्टर आहे. क्षेत्र वाढत असल्याने पुढील हंगामातदेखील बियाण्यांची मागणी वाढू शकेल. सोयाबीन स्वपरागसिंचित पीक असल्याने राज्यात वापरण्यात येणारे बियाणे सरळ वाणाचे असते. त्यामुळे ते दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही.
मागील दोन वर्षात पेरणी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून तयार झालेले सोयाबीन हे चांगल्या प्रतीचे बियाणे म्हणून आगामी खरिपासाठी वापरता येईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. बियाण्याची साठवण करताना कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. उंदीर नियंत्रणासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी असे करावे बियाणे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.