जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास मदत : पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास महसूल विभागाकडून पंचनामा केला जातो. मात्र, शेतकऱ्यांना ठोस मदत मिळत नाही. शेतकऱ्यांना मदत म्हणून जिल्हा परिषदेकडून ही योजना राबविण्यात येणार आहे. बैल जोडी खरेदीस अनुदान, जनावरांच्या अपघाती मृत्युप्रकरणी मदत यासारख्या योजनांमधून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ होईल. - बाबूराव वायकर, सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, पुणे जिल्हा परिषद.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : नैसर्गिक आपत्ती, अपघातांमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अपघातात जनावर दगावल्यास शेतकऱ्याला पाच ते पंधरा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे या नावीन्यपूर्ण योजनेसाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.

पशुसंवर्धन विभागाकडून दुर्गम भागातील आणि शेतीक्षेत्र कमी असलेल्या शेतकऱ्यांना शेती कामांकरिता बैल जोडी खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्याची योजनाही जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणार आहे. वादळी वारे, जोरदार पाऊस, पूर, जळीत, वीज व झाडपडीच्या घटनांमध्ये जनावरांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यामुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. जनावरांचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघात विमा शेळी, मेंढी या लहान जनावरांसाठी ५ हजार रुपये, तर गाय, बैल, म्हैस या मोठ्या जनावरांना मृत्यू झाल्यास १५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com