नाशिक: कोरोनामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री करण्यात तर दुसरीकडे ग्राहकांना तो खरेदी करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसह मागणी व पुरवठा साखळी अडचणीत सापडली आहे. या समस्येवर मात करण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला पॅकेज थेट मुंबईकरांच्या दारात’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने दोन वाहनांतून आठ प्रकारच्या भाजीपाल्याची पॅकिंग करून माल पाठविण्यात आला आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाशी मार्केट व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे भाजीपाला पुरवठा होण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून थेट घरात भाजीपाला पुरविण्यासाठी कार्यकर्त्यांनी हे काम हाती घेतले आहे. तालुक्यातील शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. ज्या शेतकऱ्यांचा माल काढणीसाठी तयार आहे. त्यांना संपर्क करून शेतीमालाची रास्त दरात खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये हिरवी मिरची, ढोबळी मिरची, कांदे, बटाटे, टोमॅटो, कोबी, भोपळा व शेवगा हा भाजीपाला पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.
हा भाजीपाला संकलित करून बाजार समिती आवारात हाताळणी व प्रतवारी करून विशिष्ट पिशवीमध्ये तो भरला जात आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून देवा वाघ हे काम पाहत आहेत.
भाजीपाल्याच्या गुणवत्तेलाही प्राधान्य दिले जात असून कृषिमंत्री श्री.भुसे यांनी विशेष लक्ष घातले आहे. स्वतः भेट देऊन कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. हा सर्व शेतमाल पॅकिंग करून मुंबईकडे पाठविण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे याकामी सहकार्य लाभत असून अगदी रास्त दरात हे पॅकेज ग्राहकांच्या दारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ही आहे उपक्रमाची वैशिष्ट्ये:
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.