पुणे : गेल्या आठवड्यापासून विदर्भाच्या काही भागांत उन्हाचा पारा वाढत आहे. यामुळे सकाळपासून झळा तीव्र होत आहे. येत्या मंगळवारपासून (ता. ५) विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट पुढील पाच ते सहा दिवस राहणार असल्याने कमाल तापमानाचा पार ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यातील अनेक भागांत कमीअधिक प्रमाणात उन्हाचा चटका आहे. यामुळे कमाल तापमानातही चढउतार होत आहे. मात्र विदर्भात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा कमालीचा वाढला आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार गेले आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी तापमान वाढत असल्याने पारा ४० अंश सेल्सिअसवर सरकत आहे. शनिवारी (ता. ३) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. सध्या दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ आणि ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच छत्तीसगडच्या दक्षिण भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, ती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. दक्षिणेकडील आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारची किनारपट्टीजवळ कमी तीव्र दाबाचे क्षेत्र सक्रीय होण्याची संकेत आहेत. आज त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, त्याचे रूपांतर चक्रीय वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने राज्यातील कमाल तापमानात वेगाने बदल होत आहे. शहरातील कमाल तापमान
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.