पुणे ः पाणीटंचाईमुळे पुणे विभागातील बहुतांशी गव्हाच्या बागायती भागात उशिराने पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागात गव्हाच्या पेरणी सरासरीच्या एक लाख ५४ हजार ८४२ हेक्टरपैकी ७५ हजार ६४४ हेक्टर म्हणजेच ४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. विभागात पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे निम्म्याच क्षेत्रावर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा कमी पावसामुळे आॅक्टोबरपासून पुणे विभागातील काही भागांत पाणाटंचाई सुरू झाली आहे. त्याचा रब्बी हंगामातील पेरण्यावर मोठा परिणाम झाला आहे. जमिनीत पुरेशी ओल नसल्याने गव्हाच्या उशिराने पेरण्या झाल्या आहेत. सध्या लवकर पेरण्या केलेल्या ठिकाणी पिके ओंबी धरण्याच्या अवस्थेत आहेत, तर उशिराने पेरणी केलेल्या ठिकाणी वाढीच्या अवस्थेत पिके आहेत. मात्र, काही ठिकाणी पाणीटंचाई सुरू झाल्याने पिके सुकत असल्याचेही स्थिती आहे.
विभागातील नगर जिल्ह्यात श्रींगोदा, कर्जत, शेवगाव, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यात बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पेरण्या नेवासा तालुक्यात झाल्या आहेत. पाणीटंचाईमुळे नगर, पारनेर, पाथर्डी, अकोले तालुक्यात अत्यंत कमी पेरण्या झाल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातही जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांत बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत. हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, आंबेगाव ही तालुके भाताची तालुके म्हणून ओळखली जात असल्याने या भागात अल्प प्रमाणात गव्हाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, मोहाळे, पंढरपूर, माढा, अक्कलकोट तालुक्यांतील काही भागांत चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित भागात बोटावर मोजण्याएवढ्याच पेरण्या झाल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.