अकाेला ः या वर्षी उन्हाच्या झळा जशा वाढल्या तसेच पाणीटंचाईचे चटकेसुद्धा अधिक सोसावे लागत अाहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प कोरडे पडल्याने त्यावर अाधारित नळ पाणी योजना बंद झाल्या. ठिकठिकाणी हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ ग्रामस्थांवर अाल्याचे दिसून येते.
या वर्षात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शिवाय जो पाऊस पडला तो कमी दिवस पडल्याने एकही प्रकल्प भरू शकला नव्हता. यामुळे मे महिन्यातच जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांनी तळ गाठला. अाता जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांचे लक्ष हे पावसाच्या अागमनाकडे लागले अाहे.
अकोला जिल्ह्यात ३८ मोठे, मध्यम व लघुप्रकल्प अाहेत. मागील वर्षात जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस अवघ्या ३७ दिवसांत पडून गेला. सरासरी ६९७.३ मिमीच्या तुलनेत केवळ ५५० मिमी पाऊस झाला होता.
कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्प भरू शकले नव्हते. त्यामुळे काही भागात दिवाळीनंतरच पाणीटंचाई जाणवू लागली. प्रामुख्याने खारपाणपट्ट्यात पाणीसमस्या अधिक तीव्र झालेली अाहे. जिल्ह्यातील उमा व निर्गुणा या मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला तर ३३ लघुप्रकल्पांपैकी बाेरगाव, सिसा उदेगाव, कुंभारी, सुकळी, चिंचपाणी, भिलखेड, धारूर, शहापूर बृहत, पाेपटखेड, पिंपळशेंडा, शिवण खुर्द, सावरखेड, जनुना, घाेटा, माेझरी, झाेडगा, माेऱ्हळ, हाताेला, दगडपारवा, तुळजापूर, गावंडगाव, सावरगाव बा., झरंडी, हिवरा, कसुरा, तामशी हे प्रकल्प पूर्णतः अाटले अाहेत.
उर्वरित नऊ प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. काटेपूर्णा, माेर्णा, पिंपळगाव, पिंपळगाव हांडे, इसापूर, कानडी, घाेंगा, पातूर, विश्वमित्रा या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या केवळ वान धरणामध्ये ६४.५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पातून सध्या शेकडो गावांना पाणी पुरविले जात अाहे. पिण्यासाठी पाणी संग्रहीत केल्याने रब्बीत सिंचनासाठी पुरेसे पाणी या प्रकल्पातून शेतकऱ्यांना मिळू शकले नव्हते.