खानदेशात पाणीटंचाईचे संकट गंभीर

खानदेशात पाणीटंचाईचे संकट गंभीर
खानदेशात पाणीटंचाईचे संकट गंभीर

जळगाव : खानदेशात नंदुरबार, पारोळा, अमळनेर, बोदवड  (जि. जळगाव), शिंदखेडा (जि. धुळे) या भागात टंचाईस्थिती बिकट बनत आहे. सुमारे १६० पेक्षा अधिक टॅंकर सुरू आहेत. यातील ८० टॅंकर एकट्या जळगाव जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती मिळाली . 

तात्पुरत्या पाणी योजना, विहिरींचे अधिग्रहण, पाण्याच्या  स्रोतांचे खोलीकरण आदी कार्यवाही सुरू आहे. परंतु भूगर्भातच पाणी नसल्याने अडचणी येत आहेत. पावसाळा सरासरीपेक्षा कमी होता. त्यातच जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जामनेर, बोदवड या भागातील सर्वच प्रकल्प कोरडे आहेत. जलसंकट वाढत आहे. या भागातील सुमारे २१० गावांमध्ये तीव्रटंचाई आहे.

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे व साक्री येथे समस्या बिकट आहे. सुमारे ३२५ गावांमध्ये टंचाई वाढली आहे. टॅंकरसंबंधीचे प्रस्ताव वाढत आहेत. अनेक प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, नवापुरात मिळून ११० गावांमध्ये टंचाई वाढली आहे. शहादामधील पूर्व भागातही टंचाई आहे. परंतु टॅंकर शहादामध्ये नंदुरबारच्या तुलनेत कमी आहेत. मे महिना उजाडेल, तोपर्यंत टंचाई स्थिती भीषण होईल. याचा फटका अनेक ग्रामस्थांना बसेल.

पाड्यांची भिस्त विंधन विहिरींवर सातपुडा पर्वतात पाऊसमान बरे होते. परंतु पाणीसाठे या भागात फारसे नसल्याने विंधन विहिरींवर अनेक पाड्यांची भिस्त आहे. मे महिन्यात या भागातही समस्या वाढू शकते, असा अंदाज आहे. विहिरींचे खोलीकरण अनेक ठिकाणी केले. परंतु भूगर्भात पाणी नसल्याने त्याचाही उपयोग दिसत नाही. शासनाचा मोठा निधी खोलीकरण, तात्पुरत्या उपाययोजनांवर खर्च झाल्याचे सांगितले जात आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com