‘वंचित’चे उमेदवार १५ ऑगस्टनंतर  होणार जाहीर ः  ॲड. प्रकाश आंबेडकर

अॅड. प्रकाश आंबेडकर
अॅड. प्रकाश आंबेडकर

नागपूर   : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु, अद्याप त्यासंदर्भात कोणतीच अधिकृत चर्चा झालेली नाही. १० ऑगस्टपर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच्या युतीचा निर्णय न झाल्यास १५ ऑगस्टनंतर आमचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

रविभवन येथे ॲड. आंबेडकर माध्यमांशी बोलत होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष घराणेशाहीचा वारसा चालविणारे पक्ष आहेत. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत त्यांना अपयश आले, अशी टीका ॲड. आंबेडकर यांनी केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादीमधील नेते आमच्या सोबत येणार किंवा नाही, यासंदर्भाने काहीही बोलायला तयार नाहीत. कॉंग्रेसचे राज्यातील नेतृत्व वेगळे बोलते आणि केंद्रातील नेतृत्व वेगळीच भाषा बोलते. त्यामुळे आम्ही १० ऑगस्टपर्यंत वाट बघू. त्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू, असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. 

पक्षाबद्दलची प्रामाणिकता, निष्ठा कमी होत चालली आहे. त्यामुळे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहेत. हे केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच घडत आहे असे नाही; तर भाजप आणि शिवसेनेसोबत सुद्धा होतेय. आम्हाला कुठल्याही यात्रेची गरज नसून, आम्ही लोकसभा निवडणुकीतच जमीन तयार करून ठेवल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेवर टीका केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com