नागपूर ः शेतकऱ्यांकडून संरक्षित सिंचनाचे पर्याय असल्याने खरीप हंगामात नागपूर परिसरातील पेंच, तोतलाडोह तसेच खिंडसी या भागातील प्रकल्पातून पाण्याची मागणीच राहत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे असलेल्या अप्पर वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाच पाळ्या देण्याचे नियोजन केले जाते. ३१ मार्चपर्यंत पाण्याच्या पाच पाळ्या देण्यात येतात, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली.
यावर्षी प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता एक जादाची पाळी सोडण्यात आली. उन्हाळी किंवा खरीप पिकाकरिता मात्र अपर वर्धा प्रकल्पातून सिंचनाकरिता पाणी दिले जात नाही. पिण्याकरिता आणि उद्योगाकरिता राखीव असल्याने असा निर्णय घेतला जातो, असेही सांगण्यात आले. रब्बी पिकांकरिताच अपर वर्धा प्रकल्पातील पाण्याचे आरक्षण ठेवले जाते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. मोर्शी, वरुड शिवारातील शेताला या पाण्याची उपलब्धता होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.