पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा कमी भरपाई

पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा कमी भरपाई
पंचनाम्याच्या तुलनेत तीस टक्क्यांपेक्षा कमी भरपाई

रत्नागिरी ः अतिवृष्टीत रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नागली पिकांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. शासनाकडून हेक्टरी ८ हजार रुपये मदत जाहीर झाली असून, गुंठ्याला ८० रुपयेच मिळतील. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे कसण्यासाठीचे क्षेत्र कमी आणि सातबावरील सहहिस्सेदार अधिक असल्यामुळे ही मदत अपुरी ठरणार आहे.

अतिवृष्टीमुळे कोकणातील गरवे, निमगरवे भातबियाण्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्वेक्षणात ५३ हजार ९३७ शेतकऱ्यांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले. पंचनाम्यात नुकसानीची रक्कम सुमारे २६ कोटी ७५ लाखांच्या घरात जाते. त्यापोटीची मदत जाहीर झाली असून, राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपये ठेवले आहेत. त्यानुसार जिल्ह्याला ९ कोटी ३६ लाख ४८ हजार रुपये मिळतील. ही रक्कम पंचनाम्यातील नुकसानीच्या तुलनेत अवघी तीस टक्केच आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हेक्टरी भातशेती करणारे शेतकरी अत्यल्प आहेत. एकरी किंवा काही गुंठ्यात क्षेत्र असते. जुन्या निकषानुसार हेक्टरी ६ हजार ८०० रुपये मदत मिळत होती. त्यात बाराशे रुपयांची भर पडली असून, ती हेक्टरी आठ हजार रुपये केली आहे. 

महाराष्ट्रात नवीन सरकार येईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान तिप्पट मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती; मात्र राष्ट्रपती राजवटीमुळे ती फोल ठरली आहे.कोकणात सातबारावरील सहहिस्सेदारांच्या नावांची संख्या अधिक असल्यामुळे मदत वाटपात नेहमीच अडचणी निर्माण होतात. भातशेती नुकसानीतही त्याचा प्रत्यय येईल. गुंठ्याला ८० रुपये म्हणजे ज्यांची वीस गुंठे जमीन असेल त्यांना १६०० रुपये मिळतील. सहहिस्सेदारांमध्ये वाटप करताना प्रत्येकाच्या वाट्याला कवडीमोल भरपाई मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com