वर्धा जिल्ह्यात ३१ हजारांवर शेतकरी कर्जमुक्‍त

वर्धा जिल्ह्यात ३१ हजारांवर शेतकरी कर्जमुक्‍त
वर्धा जिल्ह्यात ३१ हजारांवर शेतकरी कर्जमुक्‍त

वर्धा : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ जाहीर केली आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आत्तापर्यंत सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली असून, २७८ कोटी ५२ लक्ष रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या रकमेव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा कर्ज खात्यात भरणा करून नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम वालदे यांनी केले आहे. विविध बॅंकांच्या वरिष्ठ अधिकारी यांची राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या वेळी बैठकित अनुत्पादित कर्जखात्यावर (NPA) खात्यांना (Hair Cut) लावण्यास मंजुरी दिलेली असून त्यानुसार Hair Cut नंतर शिल्लक असलेली कर्जाची रक्कम व योजनेच्या प्रारूपानुसार ३० सप्टेंबर २०१९ नंतरचे व्याजाची रक्कम बॅंकांना सोसावी लागणार आहे. यासाठी बॅंकांनी बैठकित संमती दिली असल्याचे वालदे यांनी सांगितले. या बाबत काही तक्रार असल्यास संबंधित सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या ९८९०१९०९८१, ९८२२२३७६८१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा कार्यालयाच्या ०७१५२ २५५७५६ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. असे जिल्हा उपनिबंधक यांनी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com