नाशिक : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर अनेक बागांचे नुकसान झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा हंगाम उभा करून द्राक्ष उत्पादन घेतले आहे. मात्र, थंडी वाढत असल्याने काढणीयोग्य मालाला तडे जात आहे. ज्या बागांमध्ये १४ ब्रिक्सच्या पुढे उतरली आहे, अशा बागांमध्ये केसासारखे सूक्ष्म तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत.
दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यामध्ये हवामानाच्या बदलांमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष उत्पादनांत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. तर ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाश नसल्याने त्याचा मणी फुगवणीवर, साखर उतरण्यावर झाला आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील अनेक बागांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे चालू वर्षी द्राक्ष उत्पादनांवर फटका बसत आहे. तापमान १० अंशाच्या खाली येत असल्याने या अडचणी प्रामुख्याने येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जमिनीतून वेलीला होणारा फॉस्फरस पुरवठा कमी झाल्यामुळे साखर उतरण्याच्या प्रक्रियेत अडचणी तयार होतात. थंडी वाढल्यामुळे मण्यांचा आकार येण्यात परिणाम होण्याची शक्यता आहे.
पान देठ परीक्षणानुसार पहिल्यापासून फॉस्फरस पुरवठा सुरळीत आहे. प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होण्यासाठी पाने संक्षम असावित, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
ज्या बागांमध्ये भुरी रोग व थ्रीपच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाले आहे. त्या बागांमध्ये लवकर तडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वापसा स्थितीनुसार सिंचनाचे नियोजन करावे. - सचिन वाळुंज, द्राक्ष तज्ज्ञ, सह्याद्री
प्रमुख अडचणी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.