मुंबई : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची तातडीने गंभीर आणि योग्य दखल घ्या, अन्यथा हे आंदोलन दिल्लीपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण देशभरात पसरेल, अशी इशारा वजा मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार यांनी म्हटले आहे, ‘‘शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकारमधील संघर्ष कायम राहिल्यास आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशभरातील लोक आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि हे आंदोलन देशभरात पसरेल. शेतकरी आंदोलन करतात तेव्हा त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. पण, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. मला आशा आहे की, केंद्र सरकारला लवकर शाहणपणा येईल आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करेल. देशातील शेती व अन्न पुरवठ्यात पंजाब आणि हरियाना येथील शेतकरी सर्वाधिक योगदान देतात. या राज्यांतील शेतकरी केवळ आपल्या देशाचे पोट भरतात असे नाही, तर जगभरातील अनेक देशांना अन्नधान्य, विशेषत: तांदूळ आणि गहू पुरवठा करण्यात मोठे योगदान देतात. कृषी विधेयक संसदेत सादर केल्यानंतर ती घाईगडबडीने मंजूर करू नयेत, अशी आमची मागणी होती. पण, सरकारने ऐकले नाही आणि आता त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.