नागपूर : शेतकरीविरोधी कृषी कायदे मागे घ्या, या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या सहा दिवसांपासून बसलेले आहेत. दिल्लीतील या आंदोलनाला पाठिंबा आणि केंद्र सरकारचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी (ता.१) केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. नागपुरातील बेसा चौकात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी लाखों शेतकरी दिल्लीत सहा दिवसांपासून ठाण मांडून आहेत. परंतु केंद्र सरकार मस्तीमध्ये आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. केंद्र सरकारने तीन दिवसांत तोडगा न काढल्यास महाराष्ट्रातही आंदोलनाचा भडका उडवू, असा इशारा श्री. तुपकर यांनी येथे दिला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.