औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे भाजीपाला घेण्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, महानगरपालिका यांनी एकत्र येऊन शेतकरी गटांमार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला व फळे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी येथे भाजीपाला व फळे यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी फळे व भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक व्यापारी यांची मोठी गर्दी होते व सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. यामुळे कोरोना रोगाचे संक्रमण होण्याचा धोका संभवतो.
औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी गटांनी भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विकण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. अशा शेतकरी गटाची माहिती कृषी विभागाने गोळा केली आहे व ती महानगरपालिकेला दिली आहे. महानगरपालिकेचे अधिकारी अशा शेतकरी गटांना मोठ्या कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीशी जोडून देणार आहेत. भाजीपाला व फळे विक्रीच्या ठिकाणी गर्दी टाळावी म्हणून ते शेतकरी गट विशिष्ट वजनाच्या चार ते पाच भाज्यांची एक थैली करणार आहेत. शेतकरी गटाकडून भाजीपाला विक्री... पहा video
शेतकरी गट कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीचे अध्यक्ष/ सचिव यांना दररोज किती भाजीपाला लागणार याची माहिती घेऊन या भाजीपाल्याच्या पिशव्या अध्यक्ष किंवा सचिव यांना पैसे घेऊन सुपूर्द करणार आहेत. काही शेतकरी गटांनी भाजीपाला व फळे थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधलेला आहे. आणखीही काही शेतकरी गटांना आपला भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करायचा असेल तर त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. त्याचबरोबर आपले तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तसेच आत्माचे बीटीएम/ एटीएम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डाॅ. तुकाराम मोटे यांनी केले आहे.
संपर्क अधिकारी आणि यांचे क्रमांक
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.