नवी दिल्ली ः कारखान्यांवर साखर विक्रीचा दबाव, त्यात शीतपेये, अाइस्क्रीम उद्योगांकडून मागणी कमी राहिल्याने साखरेच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली अाहे.
मुंबईत मध्यम दर्जाच्या साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,६१० रुपयांपर्यंत खाली अाला अाहे. कोल्हापूर येथेही साखरेच्या दरात प्रतिक्विंटलमागे २० रुपयांनी घट झाली अाहे. दिल्ली, मुझ्झफरनगर येथील दरही कमी झाले असल्याचे दिसून अाले अाहे.
चालू हंगामातील नवीन साखरेची अावक अाता वाढणार अाहे. त्यामुळे जुना साखरसाठा संपविला जात अाहे. साखर विक्रीसाठी दबाव वाढल्याने दर कमी झाले अाहेत, असे मुंबई येथील व्यापारी मुकेश कुवादिया यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातही उद्योगांकडून मागणी कमी राहिल्याने साखरेच्या दरात घसरण झाली अाहे. फेब्रुवारीमध्ये उद्योगांकडून साखरेच्या मागणीत वाढ होईल, असा अंदाज दिल्ली येथील व्यापारी नरेश गुप्ता यांनी व्यक्त केला अाहे. देशातील कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत १.३७ दशलक्ष टन साखर उत्पादन घेतले अाहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ७९ टक्क्यांनी अधिक अाहे, असे भारतीय कारखानदार संघटनेने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले अाहे.
यंदा देशातील बहुतांश कारखान्यांनी लवकर हंगाम सुरू केल्याने अधिक साखर उत्पादन घेण्यात अाले अाहे. उत्तर प्रदेशने हंगामाच्या पहिल्या ४५ दिवसांत ३ लाख २६ हजार टन साखर उत्पादन घेतले अाहे.