नवी दिल्ली ः कमी दर अाणि त्यात अनियमित पावसामुळे भारतातील सोयाबीन उत्पादनात यंदा (२०१७-१८) १३ टक्क्यांनी घट होऊन ते १० दशलक्ष टनांपर्यंत खाली येईल, असा अंदाज अमेरिकच्या कृषी विभागाने (यूएसडीए) व्यक्त केला अाहे.
गेल्या जुलैमध्ये भारतातील सोयाबीन उत्पादन ११.५ दशलक्ष टनांपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र अाता सुधारित अंदाज अहवालात त्यात अाणखी घट होणार असल्याचे नमूद केले अाहे.
देशातील सोयाबीन लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.२ टक्क्यांनी घट झाली अाहे. सोयाबीन उत्पादनात अाघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशात अातापर्यंत ५.०१ दशलक्ष हेक्टरवर लागवड झाली अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीकक्षेत्र कमी असल्याचे कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार दिसून अाले अाहे.
देशातील एकूणच तेलबिया उत्पादन घटण्याची चिन्हे अाहेत. देशातील एकूण उत्पादन ३५.९ दशलक्ष टन होईल, असा अंदाज यूएसडीएने व्यक्त केला अाहे.
भारतातील शेतकरी सोयाबीन पिकांकडून अधिक फायदेशीर उत्पन्न देणाऱ्या कापूस; तसेच भाजीपाला पिकांकडे वळले अाहेत. त्यात सोयाबीनला कमी दर मिळत अाहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड कमी केली अाहे. अलीकडील काही दिवसांत बाजारातील तेलबियांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे ‘यूएसडीए’ने अहवालात नमूद केले अाहे.