नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग असलेल्या नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या निर्मितीत नाशिक तालुक्यासह सिन्नर तालुक्यातील १७ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. बाधित शेतकऱ्यांना शासन कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. शासन आणि मी स्वत:शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करणार आहे. गेल्या तीन वर्षांत अधिक भावाने झालेल्या खरेदी खताची प्रत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे दिल्यास त्या भावाने मूल्यांकन करून सुमारे पाच पट अधिक भाव बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग भूसंपादन प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे. या मार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सिन्नर येथे शनिवारी (ता. १२) या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, तहसीलदार राहुल कातोडे, प्रांताधिकारी पूजा गायकवाड, उदय सांगळे, संजय सांगळे, दीपक बरके, संग्राम कातकाडे, विजय कातकाडे, संजय सानप आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.