यवतमाळमध्ये पुन्हा पंचनामे

संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही जिल्ह्याची पीक आणेवारी उत्तम असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचा विरोध झाल्याने प्रशासनाकडून आता पुन्हा मोका पाहणी करून संयुक्त पंचनामे केले जाणार आहेत.
यवतमाळमध्ये पुन्हा पंचनामे Panchnama again in Yavatmal
यवतमाळमध्ये पुन्हा पंचनामे Panchnama again in Yavatmal

यवतमाळ :  संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र त्यानंतरही जिल्ह्याची पीक आणेवारी उत्तम असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचा विरोध झाल्याने प्रशासनाकडून आता पुन्हा मोका पाहणी करून संयुक्त पंचनामे केले जाणार आहेत.  जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामाला नैसर्गिक संकटांचे आव्हान निर्माण झाले होते. सुरुवातीला निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे सोयाबीन उत्पादकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर सोयाबीनवर खोडकिडी सह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अनेक  शेतकऱ्यांना हेक्टरी एक क्विंटलची उत्पादक देखील झाली नाही. कपाशीची देखील अशीच अवस्था झाली. पावसामुळे कापसाचे बोंड सडली. नंतर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक काढून टाकावे लागले. अशा प्रकारची स्थिति जिल्ह्यात सोळा तालुक्यात निर्माण झाली होती. परंतु त्यानंतरही प्रशासनाने जिल्ह्याचे आनेवारी ५४ दाखविली. यात प्रशासनाने पीक पाणी अहवालात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या वतीने घाटंजी बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी देखील तक्रार दाखल केली होती. या सर्वांची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने आता कृषी व महसूल कर्मचाऱ्यांना मोका पाहणी करून नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com