khandesh
khandesh

खानदेशात अवकाळीने पाच हजार हेक्टरवरील पिकांची हानी 

खानदेशात गेल्या आठवड्यातील वादळी पावसासह गारपिटीत पाच हजार हेक्टरवरील रब्बी पिकांची हानी झाली आहे. तसा अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे.

जळगाव ः खानदेशात गेल्या आठवड्यातील वादळी पावसासह गारपिटीत पाच हजार हेक्टरवरील रब्बी पिकांची हानी झाली आहे. तसा अहवाल प्रशासनाला सादर झाला आहे.  सलग तीन दिवस अनेक भागात गारपीट झाली होती. रोज वेगवेगळ्या भागात गारपीट व वादळाने पिकांची हानी झाली. यामुळे पंचनाम्यांची व्याप्तीदेखील प्रशासनाला वाढवावी लागली. त्याचा अहवाल सादर करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर, धुळ्यात १२०० व नंदुरबारात एक हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. यात सर्वाधिक नुकसान रब्बी पिकांसह कांद्याचे झाले आहे.  धुळ्यातील साक्री, धुळे, जळगावमधील जामनेर, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोलचा काही भाग, रावेरचा काही भाग, जळगावचा पूर्व भाग आदी भागात आणि नंदुरबारमध्ये नंदुरबार व नवापुरात पिकांची हानी झाली आहे. सुमारे २०० कोटींची हानी झाल्याचा दावा सुरवातीला केला जात होता. परंतु काही भागात पिकांचे नुकसान ३५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे सातपुडा लगतचा धुळे, जळगाव व नंदुरबारमधील भाग नुकसानीतून वगळला आहे.कारण या भागात सुसाट वारा व तुरळक पाऊस, अशी स्थिती होती.  मका, ज्वारी, गहू, बाजरी, भाजीपाला पिकांची हानी झाली आहे. शेतकऱ्यांना खरिपातही फटका बसला आता रब्बी हंगामही ऐन हातातोंडाशी आलेला असताना गारपीट झाल्याने निम्मे खानदेशातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com