सातारा जिल्ह्यात चारशे हेक्टरवरील आले पिकात कंदकुज

अले पीक कंदकुज
अले पीक कंदकुज

सातारा  ः गेल्या दोन ते तीन वर्षांत आल्याला समाधानकारक दर मिळाल्याने जिल्ह्यात या वर्षी आले पिकांचे क्षेत्र वाढले होते. मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चारशे हेक्टरवरील क्षेत्रास कंदकुजचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  जिल्ह्यातील वातावरण आले पिकांस फायदेशीर असल्याने येथील आल्यास मागणी असते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आले पिकाचे दर समाधानकारक राहिल्याने प्रत्येक वर्षी आले पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. या वर्षी आले लागवडीच्यावेळी आल्याचे दर समाधानकारक असल्याने बियाण्याचे दरही तेजीत राहिले होते. आल्याच्या प्रतिगाडीस (५०० किलो) ३५ हजार ते ३६ हजार रुपयांने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी होते. लागवड वाढल्याने बियाण्यास मागणी चांगली राहिली होती.  साधारणपणे अक्षय तृतीयाच्या महूर्तावर लागवड केली जाते. मात्र या काळात ४० सेल्सिअस अंशांवर तापमान गेले होते. मे महिनाअखेर अशीच परिस्थिती राहिल्याने आले लागवड रखडली होती. यातून काही शेतकऱ्यांनी लागवड केल्याने आले उगवणीवर परिणाम झाला होता. जून महिन्याच्या सुरुवातीस वातावरणात बदल झाल्याने आले लागवडीस वेग आला होता. या हंगामात जिल्ह्यात २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याचा अंदाज आहे. कोरेगाव, सातारा, खटाव, कराड या तालुक्यांत सर्वाधिक आले पिकांचे क्षेत्र आहे. 

अतिवृष्टीचा परिणाम ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस अतिवृष्टीमुळे झाल्याने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. आठ ते दहा दिवस पाऊस सुरू राहिल्याने शेतात पाणी काढता आले नाही. पाण्याचा निचर न झाल्यामुळे आले पिकास कंदकुज होण्यास प्रारंभ झाला आहे. कंदकुजीबरोबर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांकडून पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. मोठ्या प्रमाणात फवारणी तसेच आळवणी देण्याचे काम सुरू आहे. यामुळे भांडवली खर्चातही वाढ होणार आहे. पश्चिम भागात अतिपावसाने तर पुर्व भागात कमी पावसाने हुमणीमुळे कंदकुजीचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यात झालेल्या लागवडीस सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर कंदकुजच झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याने आले पिकांची गणिते चुकणार आहेत. पीकविम्यात समावेश करावा आले पिकास भांडवली खर्च मोठा आहे. एक एकर क्षेत्रास मेहनीतीपासून काढणीपर्यंत दीड ते दोन लाख किमान खर्च येतो. आले पिकांच्या दरातील अस्थिरता मोठी असल्याने या पिकांत नुकसान होण्याची भीती जास्त आहे. त्याच आल्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण लवकर येत नाही. काही वेळेस या किडीचा प्रादुर्भावामुळे आले हातचे जाते. हे धोके कमी करण्यासाठी आल्याचा पीकविम्यात समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com