साखर कारखाना
साखर कारखाना

इथेनाॅल दरात वाढीच्या निर्णयाने दिलासा ः नाईकनवरे

कोल्हापूरः केंद्र सरकारच्या इथेनाॅल दरात वाढ करण्याच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना फायदा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. ते म्हणाले, की केंद्र शासनाने इथेनॉलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फायदा कारखान्यांना नक्की होइल. केंद्राने साखरेचा किमान विक्री दर २९०० वरून ३१०० केला होता. या आधारे या किमती वाढविल्या आहेत. ही वाढ अपेक्षित होती.  या मध्ये एक महत्त्वाचा निर्णय आहे, तो म्हणजे शासनाने थेट साखरेपासून इथेनॉल करायलाही परवानगी दिली आहे. हा निर्णय साखर कारखान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. आतापर्यंत ‘सी’ व ‘बी’ मोलॅसिसला परवानगी होती. आता थेट साखरेपासून इथेनॉलला परवानगी असल्याने व दरही चांगला असल्याने कारखान्यांना याचा फायदा होऊ शकेल. अनेक कारखान्यांकडे जुना साखरेचा साठा शिल्लक आहे. वेळेत विक्री न झाल्याने गोदामेच्या गोदामे साखर तशीच आहे. साखर काहीशी पिवळसर पडत असल्याचे या साखरेला फारशी मागणी नाही. यापासून थेट इथेनॉल तयार करता येइल. यामुळे शिल्लक साखरेचा उठाव होइल. गोदामे रिकामी होतील. नवीन साखरेसाठी जागा निर्माण होईल आणि महत्त्वाचे म्हणजे नवीन अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी बॅंकेची दारे कारखान्यांना खुली होतील. साखरेपासून इथेनॉलला परवानी द्या, ही मागणी आम्ही महासंघातर्फे अनेक दिवसांपासनू करत होतो. ती मान्य झाल्याने आता कारखान्यावरचा भार हलका होण्यास मदत होण्याची शक्‍यता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com