नवी दिल्ली : निवडणूकीच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर केली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थात ‘पीएम किसान’ योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये देण्याची घोषणा प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.
मंत्री गोयल म्हणाले, की या योजनेतंर्गत वर्षात तीन हप्त्यांमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्यात येणार आहे. योजनेची १ डिसेंबर २०१८पासून अंमलबजावणी करण्यात येणार असून याकरिता केंद्र सरकार स्वत: ७५ हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे. देशभरातील १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल. लवकरच योजनेचा पहिला हप्त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. गेल्या काही निवडणुकांमध्ये शेतकर्यांच्या नाराजीचा फटका मोदी सरकारला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर सरकारने आता ही तरतूद केली आहे.
गोयल काय म्हणाले?
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.