मुंबई : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने जाहीरनाम्यातून केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘शपथनामा’ जाहीर केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, एकनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
यात उद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या सात मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा या शपथनाम्यात अंतर्भाव करत बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासनही काँग्रेस आघाडीने दिले आहे.
या वेळी जयंत पाटील म्हणाले, की हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्या वतीने एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मोठी मेहनत घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर यांनी देखील यामध्ये विशेष योगदान दिले आहे. शपथनाम्यातील ठळक मुद्दे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.