राळेगणसिद्धी, जि. नगर : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठिंबा आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मी संघर्ष करीत आहे. दोन वेळा दिलेले लेखी आश्वासन केंद्र सरकार पाळले नाही. केंद्र सरकारला पत्र लिहिले असून, दिल्लीत आंदोलनासाठी रामलीला अथवा जंतर-मंतर मैदानावर जागा मिळाली तर शेतकऱ्यांसाठी शेवटचे आंदोलन करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हजारे यांनी सहभागी व्हावे, यासाठी पंकज प्रकाश श्रीवास्तव (बिहार), मोहित शर्मा (दिल्ली), राजरतन शिंदे, प्रदीप मेटी, किरणकुमार वर्मा, सतीशकुमार राज पुरोहित (कर्नाटक) या सहा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी (ता. २०) राळेगणसिद्धी येथे त्यांची भेट घेत सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी हजारे बोलत होते. शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यावर हजारे म्हणाले, ‘‘माझा केंद्र सरकारबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच आहे. स्वामिनाथन आयोगासह विविध मागण्यांसाठी मा आग्रही आहे. सरकारला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे .’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.