विषबाधा दौऱ्यातच राज्यमंत्र्यांनी साधला 'रयत क्रांती'चा प्रचार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ : विषबाधेसारख्या गंभीर प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी याच दौऱ्यात त्यांच्या संघटनेच्या प्रचाराची संधीही साधल्याने ते पर्यटनासाठी तर आले नव्हते, अशी चर्चा रंगली आहे.

विषबाधेमुळे दगावलेल्या दीपक मडावी या शेतमजुराच्या कुटुंबीयांचे सांत्वन श्री. खोत यांनी केले. त्यानंतर लोनबेहेळ ग्रामपंचायतीला त्यांनी भेट दिली. याच ठिकाणी त्यांनी सरपंचाच्या आग्रहावरून स्वच्छतागृह योजनेच्या कामाचे भूमिपूजनही आटोपले.

त्यानंतर शेतकरी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. त्यांच्यासोबत चर्चा करताना जुन्या आठवणीत ते रमले. त्यानंतर आपण लोकांच्या जीवन मरणाशी निगडित मुद्याचा आढावा घेण्याकरिता यवतमाळला आल्याचा विसरच सदाभाऊंना या वेळी पडला. त्यांनी चक्‍क विदर्भ माझा आवडता असून, रयत क्रांती संघटनेची शाखा गावात स्थापन करा, असे सांगितले. त्यामुळे सदाभाऊ विषबाधा प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आले होते की त्यांच्या संघटनेच्या प्रचारासाठी असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.

राज्यमंत्र्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडावा व त्यांना प्रकरणाचे गांभीर्यदेखील कळू नये याविषयी आता अनेक प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आर्णी येथे त्यांनी चहापान ही केले. त्यामुळे सदाभाऊ यवतमाळला पर्यटनासाठी तर आले नव्हते? अशी कुजबूज सुरू झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com