वाशीम : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी, पुरांमुळे पीक व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करावे,’’ अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली, तेथील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे. सतत पाऊस पडत आहे. आगामी काही दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. झाडावरच शेंगांना मोड फुटत आहेत. याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे यांना देवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अंदाज घेवून प्राथमिक आकडेवारी तातडीने कळवावी.’’
‘‘पावसामुळे व पुरामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने करून देय असलेली नुकसान भरपाई संबंधितांना त्वरित द्यावी. पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना सुद्धा नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून द्या,’’ अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
ठाकरे म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे मंगरूळपीर तालुक्यातील कवठळमध्ये दोन तलाव फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.