पुणे : राज्यात असलेल्या कोरड्या हवामान उन्हाचा चटका वाढत आहे. विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत आजपासून उष्णतेची लाट येणार आहे. येत्या चार ते पाच दिवस ही लाट राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. सध्या विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मराठवाड्याच्या काही भागांत व कोकण- गोव्याच्या भागांत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. रविवारी (ता.४) सकाळी चोवीस तासांत चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. दोन दिवसांपूर्वी दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टी व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती विरून गेली आहे. छत्तीसगडच्या दक्षिण भागातही चक्रीय वाऱ्याची स्थिती असून, ती समुद्रसपाटीपासून २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर कर्नाटक ते तमिळनाडूच्या उत्तर-दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे देशातील वातावरणात बदल होत असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर देशाच्या काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शहरातील कमाल तापमान
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.