खानदेशातील उष्णतेत वाढ, तापमान ४० अंशांवर

जळगाव :मागील दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे.
Heat rise in Khandesh, Temperature at 40 degrees
Heat rise in Khandesh, Temperature at 40 degrees

जळगाव : खानदेशात मागील मंगळवारी (ता. १७) व बुधवारी (ता. १८) वादळी पाऊस झाला. आता मागील दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. उशिराच्या रब्बी हंगामाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत वाढ नोंदविली गेली आहे. कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. 

धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे. तर जळगाव येथील कृषी संशोधन केंद्रातही दोन दिवस किमान तापमानाची नोंद २० अंश सेल्सिअसपर्यंत झाली आहे.

मागील आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यात पिकांचे नुकसान झाले. शिरपूर, जळगाव, चोपडा या भागांत मोठा फटका बसला आहे. आता मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दिवसा उकाडा वाढला आहे. कमाल तापमानही ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. 

पिकांना पाण्याची गरज

थंडी बायब झाली आहे. दिवसा काहीसा वारा असतो. मध्येच वारा बंद होतो. ढगांची जमवाजमव होते. थंडी कमी झाल्याने उशिराच्या गहू पिकाला फटका बसला आहे. केळी, मका, बाजरी या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची गरजही वाढली आहे. 

विविध संस्थांनी या आठवड्यात खानदेशात पाऊस, गारपिटीची शक्‍यता व्यक्त केली आहे. याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. कारण हरभरा काढणी सुरू आहे. अनेक भागात मका, ज्वारी ही पिके काढणीवर आली आहेत. तर, रावेर, यावल व मुक्ताईनगरातही केळी काढणीवर आहे. विषम वातावरणासह बाजारातील अनिश्‍चित स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता  वाढत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com