नवी दिल्ली : पाकिस्तानमधून साखर अायात मुद्द्यावर केंद्र सरकारने सारवासारव करण्यास सुरवात केली अाहे. जर पाकिस्तानमधून अनुदानित साखर भारतात अायात झाल्यास केंद्र सरकार त्याविरोधात अावश्यक पावले उचलेल. तसेच केंद्र सरकार पाकिस्तानमधून होणाऱ्या अायात साखरेवर बंदी घालण्यास संकोच करणार नाही, असे अन्न मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले अाहे.
पाकिस्तानकडून साखर निर्यातीसाठी अनुदान दिले जात अाहे. पाकिस्तानमधील साखर भारतात अाल्यास देशांतर्गत साखर दर खाली येतील, अशी भीती व्यक्त करण्यात अाली अाहे. या पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयाने पाकिस्तानमधून साखर होत असल्याचे निर्दशनास अाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले अाहे. साखरेवर अायात शुल्क वाढविण्याबरोबरच केंद्र सरकार साखर अायातीवर बंदी घालू शकते, असेही सूत्रांनी म्हटले अाहे.
पाकिस्तानने १५ लाख टन अनुदानित साखर निर्यातीसाठी परवानगी दिली अाहे. यामुळे पाकिस्तानमधून वाघा सीमेमार्गे भारतात साखर अायात होण्याची शक्यता वर्तविली जात अाहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेने साखरेवरील अायात शुल्क ५० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी केंद्र सरकारने केली अाहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये यंदाच्या हंगामात ८० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज अाहे. पाकिस्तानमध्ये ५० लाख टन साखरेचा वापर राहिल्यास ३० लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहणार अाहे. त्यासाठी यातील १५ लाख टन साखर निर्यातीसाठी पाकिस्तान सरकारने परवानगी दिली अाहे.