गंगापूर धरणात चार वर्षांतील कमी पाणीसाठा

गंगापूर धरणात चार वर्षांतील कमी पाणीसाठा
गंगापूर धरणात चार वर्षांतील कमी पाणीसाठा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी सरासरी पाणीसाठा आहे. सध्या धरणात ३६ टक्के म्हणजे २०१० दशलक्ष घनफूट इतकेच पाणी उरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा ताे चार टक्क्यांनी कमी असून समूहातही गतवर्षीपेक्षा सहा टक्के कमी पाणी उपलब्ध अाहे.

गेल्या चार वर्षांत २०१६ मध्ये या वेळी धरणात सर्वाधिक ४७ टक्के आणि समूहात ३५ टक्के पाणीसाठा होता. पावसाने ओढ दिल्यास शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविल्यानंतरही जुलै उजाडला तरी अपेक्षेनुसार पाऊस पडलेला नाही. माॅन्सूनचे चालू वर्षी उशिराच आगमन झाले. या काळात मुसळधार पावसाची अपेक्षा असताना तो हलका आणि मध्यम स्वरूपाचा पडत आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्येही संततधार सुरू आहे; पण नद्या-नाल्यांना पूर येण्याइतका हा पाऊस नसल्याने धरणांतही पाण्याची आवक कमी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com