भंडारा ः वर्षातून एकदाच तेंदूपत्ता हंगाम येतो. त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत असल्याने वनविभागाने तेंदूपत्ता संकलनासाठी सर्वच्या सर्व ३७० केंद्र सुरू करावीत, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
लाखनी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. सुनील केदार म्हणाले की, तेंदूपत्ता मजुरांच्या रोजीरोटीचा खर्च याच व्यवसायातील उत्पन्नाच्या माध्यमातून भागतो. हे लक्षात घेता तेंदूपत्ता खरेदी गरजेची आहे. त्याकरिता सर्वच सर्व ३७० केंद्र सुरू करण्यात यावे. शेतकरी व शेतमजुरांना शेतीकामासाठी जातांना अडवणूक करण्यात येऊ नये. पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत करण्यात येऊ नये. खरीप हंगाम तोंडावर आहे, ते पाहता शेतकऱ्यांना कर्ज मागणीसाठी लागणारे स्टॅम्प व आवश्यक दस्तऐवज याकरिता फोटो स्टुडिओ व झेरॉक्सची दुकाने उघडण्याची मंजुरी देण्यात यावी.
यावेळी आमदार राजू कारेमोरे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, तहसीलदार माणिक विराणी, बाळासाहेब टेळे, खंडविकास अधिकारी नपचे उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.