औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक जिल्हा एक पीक, स्मार्ट अंतर्गत जास्तीत जास्त प्रकल्प उभे राहण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गटांनी पुढे यावे, निधीची कुठलीही अडचण येणार नाही. बँक कर्ज मंजूर करण्यासाठी पण मदत केली जाईल,’’ असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री यांचे ‘विकेलं ते पिकेल’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना आपल्या पिकांची मूल्य साखळी निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात गाव, तालुका, जिल्हा स्तरावर शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. याच हेतूने सिल्लोड येथे रविवारी (ता.१८) महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळा झाली.
सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व दोन्ही तालुक्यातील क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी प्रास्ताविक करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पतून उभे करायच्या कृषी प्रक्रिया उद्योगाचे सादरीकरण केले. प्रकल्प उपसंचालक वैशाली कुलकर्णी यांनी स्मार्ट प्रकल्प विषयी सादरीकरण केले. डॉ. भगवान कापसे यांनी मका प्रक्रिया उद्योगावर माहिती दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.