मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेत आल्यास कर्जमाफी : राहुल गांधी

मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेत आल्यास कर्जमाफी : राहुल गांधी
मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेत आल्यास कर्जमाफी : राहुल गांधी

मंदसौर, मध्य प्रदेश : या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर मध्य प्रदेशमध्ये आमचा पक्ष सत्तेत आल्यास दहा दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी (ता.६) येथे केली.  येथे मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ आणि राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे बसले आहेत. मी तुम्हाला आश्‍वासन देऊ इच्छितो, की मध्य प्रदेशमध्ये सत्ता आली तर सरकार दहा दिवसांत कर्जमाफी करेल, असे राहुल म्हणाले. शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सहा शेतकरी ठार झाल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मंदसौर जिल्ह्यातील पिपलिया मंडी येथे आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. राज्यात आमच्या पक्षाचे सरकार आल्यानंतर गेल्या वर्षी शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबारासाठी जबाबदार लोकांवरही कारवाई केली जाईल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले. राजस्थान आणि छत्तीसगडबरोबर मध्य प्रदेशमध्येही या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जेव्हा मोदींना भेटायला गेलो, तेव्हा मोदींनी कोणतेही उत्तर दिले नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोदींकडे एकही शब्द नाही. - राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com