नाशिक : ‘‘चालू आर्थिक वर्षात २०२०-२१ खरीप पिकांसाठी २ हजार ३०० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. गेल्या वर्षापेक्षा २०१९-२० पेक्षा ९५९ कोटी रुपयांनी जास्तीचे आहे. गत चार वर्षातील खरीप पीक कर्जवाटपाचा उच्चांक आहे’’, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
पतपुरवठा योजनेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता.१५) बॅंकर्सची बैठक झाली. यावेळी मांढरे बोलत होते. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अर्धेंदू शेखर, एसबीआय बॅंकेचे क्षेत्रीय सहायक महाप्रबंधक सफल त्रिपाठी, जिल्हा उपनिबंधक सतीश खरे,जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे आदी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले, ‘‘बॅंकांनी एक वास्तववादी लक्ष्य निश्चित करावे. त्यातून जिल्ह्याची पीक कर्जाची आवश्यकता, बँकांना दिलेल्या उद्दिष्ट निश्चित होईल. येणाऱ्या आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी ते प्रभावी ठरेल. उद्दिष्ट हे शाखांची संख्या, प्रसार आणि गतिशीलता, लागवडीखालील जमीन आणि पिकाच्या उत्पादनास चालना देणारे व शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी प्रेरित करणारे असावे.’’
९५९ कोटींचे अधिक वाटप
मागील ४ वर्षांचा शेती कर्जांचा आढावा घेतला असता २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ९५९ कोटी रुपयांनी अधिक पीक कर्जवाटप झाले. जिल्ह्यात पीक कर्जवाटपात वाढ झाली. शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेवर करून किंवा नूतनीकरण करून व्याज परताव्याचा लाभ घ्यावा. ज्यामुळे जिल्ह्यातील पतपुरवठ्यास चालना मिळेल. जिल्ह्यातील शेती उद्योगातील प्रगतीत सर्वसमावेशक वाढ होईल, असे सांगण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.