चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढला

चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी त्याच्या संख्येत यंदा झालेली वाढ निश्‍चितच चिंताजनक आहे. जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मॉन्सून मार्गावर दीर्घकालीन परिणाम केला.
cyclone
cyclone

पुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी त्याच्या संख्येत यंदा झालेली वाढ निश्‍चितच चिंताजनक आहे. जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मॉन्सून मार्गावर दीर्घकालीन परिणाम केला. खरीप लागवडीवर झाला. यानंतरही चार चक्रीवादळे आली, त्यांनी खरीप काढणी प्रभावित केली. याशिवाय सततच्या ढगाळ वातावरणाने फळबागांचे मोहर, फुलोरा आणि रोगराई नियंत्रणाचे गणित बिघडवले. बुरेवी अजून तमिळनाडूत दाखल होतच आहे, तत्पूर्वीच आज (ता. ४) पुन्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आ ले.  हवामान बदलाचा परिणाम म्हणून चक्रीवादळ निर्मितीत झालेली वाढ सांगितली जात असली, तरी हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी याबाबत ‘ॲग्रोवन’शी सविस्तर वार्तालाप केला. डॉ. सानप म्हणाले, ‘‘मे महिन्यापासून आतापर्यंत पाच चक्रीवादळे भारताच्या सीमेवर धडकली आहेत. आगामी मे महिन्यापर्यंत चक्रीवादळे तयार होण्याचे संकेत आहेत. मात्र ते कधी होईल हे नक्की सांगता येत नाही. साधारणत: चक्रीवादळ तयार होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर त्यांचे अंदाज हवामान विभागाकडून दिले जातात.’’ 

प्रतिक्रिया चक्रीवादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. दरवर्षी ते तयार होत असल्याने पूर्व, दक्षिण व पश्‍चिम भारताच्या किनारपट्टीजवळील राज्यांना या चक्रीवादळाचा धोका अधिक असतो. यासंबधी काही वर्षांपासून भारतीय हवामान विभागाकडून दिले जाणारे अंदाजाची अचूकता वाढली आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी खूप कमी झाली आहे. — डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक, हवामान विभाग, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com