नाशिक : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवार (ता.१) सकाळी सहापासून गंगापूर व दारणा धरणांतून पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रासाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन २१ दिवस चालणार आहे.
गंगापूरमधून ६००, तर दारणातून २५० क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. साधारणपणे या आवर्तनासाठी २ टीएमसीवर पाणी सोडले जाणार असल्याचा अंदाज आहे. गंगापूर धरणातून सिंचन व पिण्याचे पाणी कालव्यांद्वारे व एकलहरेसाठी नदीपात्रातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये. पात्रालगत कुठलीही वाहने, साहित्य ठेवू नयेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या.
जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये आजमितीस ५६ हजार ९२४ दक्षलक्ष घनफूट (८७ टक्के) साठा आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यात प्रमाणापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातून मराठवाड्यासाठी पाणी देण्याची गरज भासणार नाही.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पाणीवापर संस्था, नळपाणी पुरवठा योजना व सिंचनासाठी मागणीनुसार पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश यंत्रणांना दिले. त्यामुळे जिल्हावासीयांना यंदा मुबलक पाणी मिळेल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.