नंदुरबार ः सातपुड्यातील रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळांची आवक धडगाव येथे वाढली आहे. खरेदीसाठी मध्य प्रदेश व गुजरातमधील व्यापारी रानमेवा खरेदीसाठी धडगावात दाखल होऊ लागले आहेत. सीताफळाची स्वतंत्र बाजारपेठ नसल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना समानकारक भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा व व्यापाऱ्यांचा फायदा, असे चित्र दिसून येत आहे.
सातपुड्यातील रानमेवा खरेदीसाठी गुजरात, मध्य प्रदेश येथील व्यापारी धडगावात दाखल झाले आहेत. टोपली पद्धतीने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे धडगाव येथे सीताफळ विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध व्हावी, अशी मागणी आहे.
फळप्रक्रिया उद्योगाची घोषणा हवेतच
सातपुड्याचा डोंगरदऱ्यातील जनतेला नैसर्गिक वनसंपत्तीचे वरदान लाभले आहे. येथे शेती चांगली नसली, तरी इतर वन उपज मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. टोळंबी, आंबा, सीताफळ यांसारखी अनेक फळे येथील रहिवाशांच्या पोटाची खळगी भरण्याची साधने बनली आहेत. मात्र, या ठिकाणी या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठ नाही. त्यामुळे श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी मिळतो. त्यामुळे वर्षभर जेमतेम पोटाची खळगी भरेल एवढे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यासाठी परिसरात प्रक्रिया उद्योग उभारण्याची मागणी वेळोवेळी झाली आहे. मात्र आतापर्यंत सारेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राजकीय नेते आले, मागणीला होकार देत आश्वासने दिली. मात्र एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.