केवळ २४ हजार शेतकऱ्यांना दहा हजाराची उचल

२४ कोटींचे वाटप राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ८९ लाख शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्यात सहभागी आहेत. तरीही या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टपर्यंत फक्त २४ हजार १३१ शेतकऱ्यांनाच उचल मिळाली आहे. त्यांना २४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत साशंकता आहे.
केवळ २४ हजार शेतकऱ्यांना  मिळाली दहा हजारांची उचल
केवळ २४ हजार शेतकऱ्यांना मिळाली दहा हजारांची उचल

मुंबई : खरीप हंगामात राज्य सरकारने जाहीर केलेली तातडीची दहा हजार रुपयांची उचल राज्यातील फक्त २४ हजार शेतकऱ्यांना मिळाली आहे. या शेतकऱ्यांना २४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. तातडीने गरजू शेतकऱ्यांना दहा हजार रुपये कर्ज देण्याच्या योजनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. बँकांना हमी देऊनही ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे; परंतु लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष लाभ मिळालेले शेतकरी यांची आकडेवारी बघितल्यास राज्य सरकारची ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे चित्र आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून कर्जमाफीसह हमीभाव मिळावा या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्याआधी सरकारने थकबाकीदार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अशी भूमिका घेतली होती; मात्र त्यानंतरही राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला. त्यानंतर सरकारने निकषांसह दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली.  मात्र या प्रक्रियेला विलंब लागणार असल्याने तोपर्यंत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी १० हजार रुपयांची उचल जाहीर करण्यात आली. खरिपासाठी बियाणे, खते आदी बाबींसाठी ही रक्कम उपयोगी पडेल, अशी अपेक्षा होती; मात्र राज्य सरकारच्या या घोषणेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते.  राज्य सरकारने सर्व जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांनी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या सर्व शेतकऱ्यांना खरिपासाठी १० हजार रुपयांचे तातडीचे कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. तातडीच्या मदतीचा लाभ केवळ गरजू शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य सरकारने काही निकष ठरवले होते. जे शेतकरी संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत, अशाच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळणार होते. कर्ज देताना शेतकऱ्यांकडून अपात्र आढळल्यास कर्जाची रक्कम व्याजासह वसूल केली जाणार असल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात येत आहे.  १४ जून रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने बँकांना १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. प्रत्यक्षात २४ दिवसांनी ४ जुलै रोजी सरकारने बँकांना हमी दिली. यात मोठा कालापव्यय गेल्याने तोपर्यंत केवळ १०८२ शेतकऱ्यांनाच १० हजार रुपयांची उचल मिळाली. २४ कोटींचे वाटप राज्यात १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ८९ लाख शेतकरी संस्थात्मक कर्जपुरवठ्यात सहभागी आहेत. तरीही या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टपर्यंत फक्त २४ हजार १३१ शेतकऱ्यांनाच उचल मिळाली आहे. त्यांना २४ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत साशंकता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com