थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहण्यास सुरुवात; थंडी वाढण्याचे संकेत
पुणे ः उत्तर भारतातील अनेक भागांत थंडीची लाट आली आहे. या भागाकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह काही प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातही हवामान कोरडे असल्याने थंडीने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांत थंडी वाढेल. मंगळवारी (ता. १२) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात नीचांकी १२.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र होते. आता हे कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. त्यातच दक्षिण भारतातील पूर्व भागातील बंगालचा उपसागराच्या नैर्ऋत्य भाग व श्रीलंकेची किनारपट्टी या दरम्यान चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह राज्याच्या दिशेने पुन्हा काही प्रमाणात सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानाचा पारा दोन ते तीन दिवसांत झपाट्याने खाली आला आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांत थंडी कमी अधिक स्वरूपात असली तरी काही भागांत थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली आहे. कोकणात अजूनही थंडी कमी असल्याने किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रात थंडी हळूहळू वाढू लागली आहे. यामुळे किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मराठवाड्यातही बऱ्यापैकी थंडी असल्याने किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. या भागात १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. विदर्भात थंडी कमी-जास्त स्वरूपात आहे. त्यामुळे किमान तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.